History, asked by bhagyashrikaranjule, 2 months ago

1857 च्या स्वातंत्र्य लढा मागे कोणती राजकिय कारणे होती​

Answers

Answered by shintredeepa14
0

Answer:

उठावाची कारणे संपादन करा

बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.

कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे. ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.

कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली. भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत. शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.

१८५७ च्या सुरुवातीला सरकारने ईनफिल्ड नावाच्या नव्या बंदुका आणल्या. त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते. बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले. ही कारणे केवळ निमित्तमात्र होती. खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.

Answered by raykarpratu
0

Answer:

राजकीय कारणे :

१७५७ पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये ताब्यात घेतली होती. पुढे डलहौसीने अनेक संस्थाने विविध कारणांनी खालसा केली. गैरकारभाराचे निमित्त पुढे करून अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले, तर सातारा, नागपूर, झाशी ही संस्थाने तेथील राजाचा दत्तकपुत्रांचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली. डलहौसीच्या या धोरणाने भारतीयांमध्ये अविश्वासाचे वातावरण वाढत गेले.

Similar questions