India Languages, asked by arshadpatel9, 1 month ago

2)शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधाविषयी तुमच्या संकल्पना स्पष्ट करा.
शब्दांचा खेळ-हेलन केलर​

Attachments:

Answers

Answered by mauryasangita716
62

Explanation:

अनेक शिक्षक अध्यापनात कुशल आणि उत्कृष्ट असूनही करडी शिस्त, तापट आणि मारकुट्या स्वभावामुळे विद्यार्थ्यांमध्ये अप्रिय असतात. काही मुले अभ्यासात कच्ची असतात, गृहपाठ करतच नाहीत. त्यांच्याबद्दलचा नकारात्मक दृष्टीकोन बदलून समस्या कौशल्याने सोडवायला हव्यात. गेल्या दीडशे वर्षांत आम्हाला शिक्षणाने केवळ बुद्धीवान आणि तर्कवादीच बनवले. आजच्या शाळा या केवळ बुद्धिमान मुलांसाठीच आहेत. सामान्य मुलांना आपल्या शाळा कधीही वर काढू शकत नाहीत. शाळा, शिक्षक ही केवळ चांगल्या, भल्या, हुशार मुलांसाठी नसून सर्वांसाठी असायला हवी. काही मुले शाळेच्या नियमाविरुद्ध वागतात. शिस्त बिघडवतात. त्यांना शेवटी शाळेतून काढून टाकले जाते. पुढे हीच मुले समाजासाठी धोकादायक बनतात आणि समाजाची शत्रू बनतात.

शिक्षकांचा पहिला धर्म सर्वांच्या शिक्षणासाठी समभावनेनेे झटणे हा आहे. समाजाला राजकीय आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करणे हा आहे. श्रीमंत आणि गरीब, उच्च नीच हा भेदभाव शैक्षणिक धोरणाला कलंक फासणारा आहे. आम्हाला आमच्या शाळेची, आमच्या अध्यापनाची अशी प्रणाली बनवली पाहिजे. ज्यातून शिक्षक हा अशा व्यवसायाशी निगडित असेल जो समाजाच्या वैभवशाली भविष्याची निर्मिती करील.

आज शिक्षकांना वाटते की, पालकांना आपल्या पाल्यांची पर्वा नाही. पालकांना वाटते की, शिक्षक विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नाहीत आणि मुलांना वाटते की, दोघेही आपल्याला समजून घेत नाहीत, तसेच शाळा संचालकांचे यातून कसा आपला उद्योग वाढवता येईल आणि मंडळाची सांपत्तिक स्थिती, प्रतिष्ठा आणि राजकीय वर्चस्व कसे अबाधित राहील याकडे जास्त लक्ष असते. अनेक शाळांत मुलांना नववीपर्यंत पास केले जाते. परिणामी ही मुले दहावीत नापास होतात आणि शाळेला रामराम ठोकतात. शिक्षणाचे झालेले बाजारीकरण आज देशापुढे सर्वांत मोठे आव्हान आहे. शिक्षक बनण्याचा ज्यांच्याकडे एकही गुण नाही ते शिक्षक बनले आहेत. मुलांना समभावनेने न शिकवणे, वरिष्ठांची हांजीहांजी करणे असे शिक्षक या शिक्षकी पेशाला कलंकित करत आहेत.

Answered by amchimumbai52
3

Answer:

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक-विद्यार्थी नातेसंबंध

8 वर्षांपूर्वी

शिक्षक व विद्यार्थ्याचे नाते कसे असावे यावर अनेकदा बोलले जाते. जुन्या पिढीचे लोक जेव्हा या नात्याविषयी बोलतात तेव्हा त्यात सलही असते की आजकाल काही खरे राहिले नाही. पूर्वी शिक्षकाला मुले खूप घाबरायची पण आजकाल घाबरत नाहीत. आमच्या काळी शिक्षक या गल्लीतून आले तर आम्ही दुसर्‍या गल्लीतून जात होतो. यातून हे नाते भीतीवर आधारित असावे असेच त्यांना सुचवायचे असते. दुसरा दृष्टिकोन असा असतो की, शिक्षकाविषयी टोकाचा खूप आदर असला पाहिजे. त्यात हे नाते गुरू व भक्त या पातळीवर जाते. आपल्या पुराणातील सर्व कथा वाचून लक्षात येते की गुरूला काहीच क्रॉस क्वेश्चनिंग नाही... फक्त ओबे द ऑर्डर. तोच शिष्य महान मानला जाई की जो गुरूचे नम्रतेने चिकित्सा न करता ऐकत असे. त्यामुळे एकूणच आपल्या परंपरेत शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते हे दोन टोकावर हिंदोळते आहे. एका बाजूला नाते भीतीवर आधारित असावे व दुसरीकडे ते नाते टोकाच्या आदरावर आधारित असावे. अर्थात आदरातही पुन्हा सूक्ष्म भीतीच दडलेली असते. तेव्हा एकूणच आपली परंपरा शिक्षक आणि विद्यार्थ्याचे नाते समान ठेवायला तयार नाही.

Similar questions