India Languages, asked by avani0745, 1 month ago

3) कथालेखन:
घटनाक्रम लक्षात घेऊन कथा तयार करा.
घटनाक्रम :
(1) रवी-खोडकर मुलगा
(2) आयफोनची मागणी - हट्ट
(3) वडिलांबरोबर साखरशाळेला भेट
(4) तेथील दृश्य
(5) अभावातून शिकणारी तरीही आनंदी मुले (6) रवीचे मन परिवर्तन
(7) रवीची कृती.​

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

मी एक नामवंत शिक्षणतज्ञ आहे. स्वतःला नामवंत म्हणवून घेणं बरोबर नाही. पण लोक तसं म्हणतात. आणि मला तुम्हाला जे सांगायचं आहे त्याला बळकटी यावी म्हणून मीच मुद्दाम हे विशेषण वापरतो आहे. मी एक शिक्षणसंस्था चालक आहे. एका मोठ्या आणि नावाजलेल्या शाळेचा मी संचालक होतो. या शाळेत मी केलेल्या प्रयोगाबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. हा प्रयोग खूप गाजला. त्यासाठी मला देशाच्या महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आलं. तो समारंभ सार्याप देशाने टीव्हीवरून पहिला. त्यावेळी राष्ट्रपती असं म्हणाले की, देशाला अत्यंत अभिमानास्पद वाटेल अशा या प्रयोगाचे मॉडेल सर्व शिक्षणसंस्थांनी उचलले पाहिजे. त्यांच्या या विधानाची दखल शिक्षण मंत्रालयाने तत्परतेने घेतली आणि त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात देखील केली.

तर हा प्रयोग काय आहे हे तुम्हाला मी थेटच सांगतो. आमची शाळा मोठी आणि नावाजलेली होती हे मी तुम्हाला सांगितलं आहेच. मी तिथे संचालक म्हणून आलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की, शाळेत मुलांची संख्या प्रमाणाबाहेर वाढल्याने संस्थेत बेशिस्त आली आहे. ते साहजिक होतं, पण त्यामुळे हुशार मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला. तशी हुशार मुलांचे वेगळे ज्यादा वर्ग घेवून त्यांची टक्केवारी वाढवण्याची सोय करणारी व्यवस्था शाळेत आधीपासून होती. पण या मुलांमध्येही बेशिस्त शिरली होती तिचं काय करायचं, हा मुख्य प्रश्न होता. शेवटी शिस्त महत्वाची. आणि शिस्तीमुळेच राष्ट्र घडतं. तेव्हा मी प्रथम मुलांचा नीट अभ्यास केला. माझ्या लक्षात आलं की मुलांची जडण घडण घरापासून सुरू होते. घरातून जे संस्कार मुलांवर होतात ते मूलत: मातापित्याच्या धार्मिक आचरणातून होतात. आमच्या शाळेत तर सर्व धर्मीय मुलांची सरमिसळ झाली होती. त्यामुळे मुलांचं आचरण एकच एक नव्हतं. त्यांची भाषाही बिघडत होती. मग मी धर्मानुसार मुलांचे वेगवेगळे वर्ग केले. शिक्षकांचीही त्यानुसार विभागणी करून त्या त्या धर्माच्या मुलांना त्याच धर्माचे शिक्षक दिले. यात एक अडचण अशी होती की काही धर्मांचे शिक्षक संख्येने कमी होते आणि काही धर्मांचे अजिबात नव्हते. पण त्याला माझा इलाज नव्हता. ज्या धर्मांचे शिक्षक नव्हते त्या मुलांना मी शाळा सोडून जाण्यास सांगितलं. ती मुलं त्यांच्या धर्मियांनी चालवलेल्या शाळेत जाण्यास मोकळी होती. यामुळे एक चांगली गोष्ट अशी झाली की शाळेवरचा मुलांचा भार काहीसा कमी झाला. मोकळी हवा खेळायला लागली. मुलांनाही अधिक मोकळा श्वास घेता येवू लागला.

Similar questions