Chemistry, asked by tanmayshete61, 2 months ago

(5) जलविद्युत निर्मितीची केंद्रे ही पर्यावरणस्नेही आहेत किंवा
नाहीत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.​

Answers

Answered by khushikansal516
6

Answer:

जलविद्युत केंद्रामध्ये उंचीवर साठविलेल्या पाण्याच्या स्थितिज ऊर्जेचा वापर वीजनिर्मिती करण्यासाठी केला जातो. जल वीजनिर्मिती केंद्र हे सामान्यपणे जेथे धरण बांधले जाऊ शकते आणि भरपूर जलाशये मिळू शकतात, अशा डोंगराळ भागात स्थित असतात. नदी किंवा तलावावर बांध बांधून पाण्याचा दाब तयार केला जातो. पाणी उंचावर साठविल्यामुळे प्रचंड दाब निर्माण होऊन त्यामध्ये स्थितिज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत होऊन टरबाइन फिरू लागतो. यात यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते .

महाराष्ट्रात कोयना, वैतरणा, येळदरी, वीर, राधानगरी, भाटघर, भंडारदरा, किल्लारी, भीरा इत्यादी ठिकाणी जलविद्युत केंद्रे चालू आहेत.

आ.१. जलविद्युत केंद्र : स्वरूप आणि व्यवस्था.

जलविद्युत केंद्राचे स्वरूप आणि व्यवस्था : धरणाची बांधणी नदी किंवा तलावाजवळ केली जाते आणि धरणाच्या पाठीमागे जलाशयासाठी पाणी साठवले जाते. जलाशयातून दबाव प्रणालीच्या साहाय्याने दाब काढून घेतला जातो आणि पाणी जलप्रवाहनियंत्रकाच्या (penstock) सुरुवातीला झडप घरामध्ये आणले जाते. झडप घरामध्ये मुख्यतः दोन प्रकारच्या झडपा असतात, एक म्हणजे कृत्रिम झडप आणि दुसरी म्हणजे स्वयंचलित झडप. कृत्रिम झडप ही ऊर्जा घराकडे जाणारा पाण्याचा प्रवाह नियंत्रित करते, तर स्वयंचलित झडप पेनस्टॉक स्फोटानंतर पाण्याचा प्रवाह खंडित करण्यासाठी वापरली जाते. ऊर्जा घरामधून जलप्रवाहनियंत्रक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या स्टीलच्या वाहकनलिकेमधून पाणी टरबाइनवर घेतले जाते. पाण्यावर चालणारे टरबाइन जलशक्तीचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करते. टरबाइनचा उपयोग रूपांतरक (alternator) चालविण्यासाठी होतो. रूपांतरकाच्या साहाय्याने यांत्रिक ऊर्जा विद्युत उर्जेमध्ये रूपांतरित केली जाते.

लाट टाकी (वरून बाजूस उघडी) ही झडप घराला लागूनच बांधली जाते. या लाट टाकीचा उपयोग जलप्रवाहनियंत्रकाचे संरक्षण करण्यासाठी होतो. जेव्हा विद्युतभार अचानक कमी होतो, तेव्हा टरबाइनचे दरवाजे अचानक बंद होतात आणि जलप्रवाहनियंत्रकाच्या खालच्या बाजूने होणारा पाण्याचा प्रवाह अचानक खंडित होऊन जलप्रवाहनियंत्रक फुटण्याची शक्यता निर्माण होते. या परिस्थितीत लाट टाकी अचानक वाढलेला पाण्याचा दाब कमी करण्यासाठी टाकीमधील पाण्याची पातळी वाढवते आणि जलप्रवाहनियंत्रक फुटण्याचा धोका टाळते.

फायदे : (१) जलविद्युत केंद्रासाठी कोणत्याही इंधनाची आवश्यकता नसते. (२) हे केंद्र पूरनियंत्रण, सिंचनसाठी पाणी साठवण आणि पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी उपयुक्त ठरते. (३) अल्प खर्चात वीजनिर्मिती होते. (४) जलविद्युत केंद्राची उभारणी साधी आणि अत्यंत मजबूत असते. (५) जलविद्युत केंद्र दीर्घकाळ कार्यक्षम असते. (६) जलविद्युत केंद्रापासून जळण, धूर आणि किरणोत्सर्गी प्रदूषणाचा धोका नसतो.

तोटे : (१) धरणाची बांधणी गरजेची असल्यामुळे जास्त भांडवली खर्चाचा समावेश होतो. (२) जलविद्युत केंद्राची कार्यक्षमता ही हवामानाच्या स्थितीवर अवलंबून असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता असते. (३) जलविद्युत केंद्राची उभारणी करण्यासाठी आणि सुरळीतपणे चालविण्यासाठी कौशल्यपूर्ण आणि अनुभवी कामगारांची आवश्यकता असते. (४) जलविद्युत केंद्र डोंगराळ भागात वसलेले असल्याने वीजनिर्मिती केल्यानंतर वीज दूरवर वाहून नेण्यासाठी जास्त खर्च येतो. (५) जलसंचय मोठ्या प्रमाणात करावा लागत असल्यामुळे जागा जास्त लागते. (६) उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे वीजनिर्मितीवर परिणाम होतो.

I hope my answer is correct

Answered by SmitaMissinnocent
1

Answer:

After 1871 nationalist tension mounted in Europe in the area called Balkan's. Many countries in the world which had been colonized by the European powers in the 19th century began to oppose imperial domination. The anti-imperial movements developed nationalism and formed independent nationstates.

Similar questions