India Languages, asked by drjyotijm777, 3 months ago

अंबरान अवनीला अभ्यांगस्नान करू दिले नाही म्हणजे काय?​

Answers

Answered by mvandana542
0

Answer:

महामहीम, एक दु:खद वार्ता आहे...."

"बोल."

"वनातून संदेश आला आहे."

काहीतरी अघटित घडलेले असल्याचा अंदाज आला आणि भीष्माचार्य आसनावर रोवून बसले. आणि दासाकडे पाहू लागले.

"पंडुंचे देहावसान झाले."

"पंडु....." जोरात किंचाळून शेजारी उभी असलेली अंबालिका कोसळली.

'पिताश्री, चित्रांगद, विचित्रवीर्य..... आणि आता पंडु? हृदयाच्या निकटचे आप्तजन! हस्तिनापुरा, पाहतो आहेस ना हा नियतीचा खेळ? माझा शिष्य..... पंडु! या भीष्माला 'तातश्री' म्हणून मनापासून आदर देणारा....हस्तिनापुरच्या सीमा विस्तारत नेणारा...... राजगादीवरचा अधिकार निस्वार्थीपणे सोडणारा.....एका नकळत घडलेल्या चुकीचं प्रायश्चित्त घ्यायला वनात, काट्याकुट्यात राहणारा पंडु! आता अस्तित्वातच नाही?'

भीष्माचार्य हळहळले.

कुंती रडत होती. युधिष्ठिर सर्व भावांना शांत करत आधार देत होता. पंडुचे शव समोर पडले होते. माद्री निर्जीव नजरेने त्या चितेकडे बघत होती. अखेरचे त्याचे शब्द.....असह्य यातनांनी जड झालेला त्याचा आवाज तिच्या कानी घुमत होता! तो उष्ण स्पर्श अजूनही पाठीवर जाणवत होता. मृत्यूसाठी व्याकूळ झालेला तो आणि दिलेल्या शापाला सत्यात उतरवायला कारणीभूत ठरलेली ती. 'आयुष्य इतकं भयंकर वाटू शकतं, आर्य, की क्षणाचाही विचार न करता तुम्ही मृत्यूला मिठी मारावी?'

"माद्री.... माद्री...." इतका वेळ काहीही न बोलता, न रडता बसलेल्या माद्रीला कुंतीने गदा गदा हालवले.

"मला जगायची इच्छा नाही, ताईश्री."

"असं बोलू नकोस माद्री."

"हे सगळं माझ्या मुळे झालेले आहे."

"माद्री.... ऋषींनी दिलेले शाप खरे ठरतात. तुझी चूक नाही त्यात."

Similar questions