CBSE BOARD X, asked by vighneshv46, 25 days ago

(अ) पंतांनी केलेल्या उपोषणासंबंधी तुमच्या प्रतिक्रिया लिहा.
(आ) पंतांच्या असामान्य मनोनिग्रहाच्या परिणामांबाबत तुमचे
मत लिहा.​

Answers

Answered by dhanrajsolanke678
2

Answer:

जळगाव येथून प्रसिद्ध होणा-या ‘साप्ताहिक बातमीदार ’मध्ये प्रबोधनकारांनी ४० आणि ५०च्या दशकात भरपूर लेखन केलं. या साप्ताहिकातील त्यांचे ‘वाचकांचे पार्लमेंट ’ हे सदर खूपच गाजले. राज्यभरातील वाचक प्रश्न विचारत आणि प्रबोधनकार त्यांना मर्मग्राही, मर्मभेदी उत्तरं देत. आत्तापर्यंत पुस्तक रुपानं प्रकाशित न झालेलं हे सदर खास ‘प्रबोधनकार डॉट कॉम ’च्या वाचकांसाठी.

(मागील अंकावरून पुढें चालू) रामचंद्र वी. प्रधान, पुणे. स०- सहा वर्षांपूर्वी आपल्या एकसष्टीनिमित्त मे. जमशेटजी वाडिया (वाडिया मुविटोनचे मालक) यांनी सत्कार समितीला १५०० रु. देणगीचे जाहीर आश्वासन दिले होते. ती रक्कम त्यांनी दिली का? ज०- मोठेपणाच्या मुरवतीसाठी देणग्या जाहीर केल्या तरी त्या दिल्याच पाहिजेत, असा नियम आहे काय? त्याच वेळी जळगांवकरांच्या वतीने महाशय गो. का. चित्रे यांनीहि १५०० रुपयांचे आश्वासन सत्कार समितीला तांरेने कळविले होते. पैकी १०० रु. समितीकडे आले. बाकीच्यांची नुसती घोषणाच! चालायचेच हे असे. मला काय त्याचे? फुला केशव ठाकूर, लोहारी, ता. पाचोरे

स०- कर्णाचा जन्म कुंतीच्या कानांतून झाला हा अनैसर्गिक चमत्कार कसा घडला?

ज०- चमत्कार कुंतीच्या कानाचा नसून पुराणकारांच्या लांब कानांचा आहे. कन्या अवस्थेत (विवाहापूर्वी) कुंतीला कर्ण झाला. अशा पुत्राला ‘कानीन’ म्हणतात. त्या शब्दावर बसवलेली ही काव्य-कसरत आहे. असले चमत्कार लोक नेहमी कानाआड करतात.

स०- आत्मस्तुती करणे चांगले का वाईट!

ज०- करून पहा. अनुभव येईल तो अक्कलखाती जमा करा. धनजी रावजी पाटील, लोहारी.

स०- निवडणुकीच्या हंगामात आपली अमोल फुली देऊन ... ...

ज०- छे छे छे छे पाटीलभाऊ, येत्या निवडणुकीत फुल्याबिल्या नाही करायच्या नाहीत हो. दर डोई एक मत. त्या मताची एकच चिठ्ठी हातात मिळेल. ती जशीच्या तशी, फुलीबुली काही न करता, उमेदवाराच्या पार्टीची चित्राची निशाणी पाहून त्या पेटीत नुसती टाकायची. लक्षात ठेवा. इतरांना सांगा. आत्माराम उखर्डू खंगार, लोहारी. ओहारी गाव जागा झाल्यासारखा दिसतो. तिघांचे प्रश्न आहेत आजच्या पार्लमेण्टात.

स०- शैक्षणिक दर्जा फारच खालावला. या निनादाने दशदिशा दुमदुमून गेल्या आहेत. ही परिस्थिती कधी नि कशी बदलता येईल?

ज०- गेल्या निवडणुकीत काँग्रेसपार्टीची हकालपट्टी केल्याने.

स०- मूठभर खरा स्वार्थ कोठे आहे नि तो कोणता?

ज०- माणसाच्या पोटात. कशीहि परिस्थिती असो, आपण काटा कूटा न रुपता खुपता शंभर वर्षे जगावे, हा तो स्वार्थ. लक्ष्मीसुत तळवेलकर, तळवेल.

स०- विजयालक्ष्मी पंडित यांची अमेरिकेतील वकीलातीची कचेरी माजविलासी थाटाची आहे. दरमहा लाखो रुपये खर्च होतात. हा भुर्दंड तुम्हाला आम्हा गरिबांच्या बोडक्यावर लादला जातो. असे नाना पाटील एका सभेत म्हणाले आणि टिंगलीने खदखदा हासले. कां बरे?

ज०- हासण्या हासवण्या पलिकडे आणखी काही त्यांना समजते. हा तुमचा गैरसमज आहे. नथू संपत शिंद, नशिराबाद.

स०- अत्रे पिक्चर्सच्या ‘ही माझी लक्ष्मी’ बोलपटात इतर अनेक साहित्यकांबरोबर काम करणारे केशवराव ठाकरे ते आपणच कां? या वयात चित्रपट व्यवसायात उतरण्यात आपला उद्देश कोणता?

ज०- होय, तोच मी. ‘आपल्या सर्व साहित्यक स्नेहीजनांची हालती बोलती चालती प्रतिमा काढून ठेवावी’ म्हणून महाशय अत्रे यांनी ही योजना केलेली आहे. तसे म्हटले तर, नथूभाऊ, मी फार पुराणा रंगेल नाटक्या आहे बरं. वयाच्या ८व्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केले.

स०- विवाह विधिकरार का बंधन? नोंदणीविवाह इष्ट का अनिष्ट?

ज०- शुभ मंगल सावधानच्या थोतांड्या विधीने होणारा विवाह, मानला तर बंधन नाहीतर करार. आता नोंदणी विवाहच इश्ट. धार्मिक विधीने कुटुंब किती का श्रीमंत असे ना, अथवा नव-याने स्वता कितीहि पैका अडका मालमत्ता केलेली असे ना. पुत्र वारस ठरतात आणि बाईला फक्त पोटगीपुरता हक्क नोंदणी विवाहाने पतीच्या मालमत्तेची पत्नि तात्काळ आठ आणे भागीदार होते. बाकीच्या आठ आण्यात पुत्रांचा वारसा. धार्मिक गडबडगुंड्याचे विवाह शक्य तितक्या लवकर बंद

Similar questions