India Languages, asked by RohanBavale, 1 year ago

aai thor tujhe upkar essay in marathi

Answers

Answered by Tanushri5
5
‘आई’ या दोन अक्षरांत पृथ्वीचे सार आहे, सौंदर्याचा अभिमान आहे, बुद्धीचे तेज आहे आणि विश्वाचे वैभव आहे. पृथ्वीला स्त्रीची आणि विशेषत: आईची उपमा देतात. कारण उन्हाळ्यात कडक उन्हाच्या तप्त झळांनी पृथ्वीला भेगा पडतात, पण पावसाळा आला की, त्याच जमिनीतून तांबूस लोभस अंकुर उगवतात. आई संकटात स्वत: खस्ता खाते, पण मुलांचा प्राणापलीकडे सांभाळ करते. संकटाशीही दोन हात करण्याचे संस्कार आईकडूनच मिळतात. संसारात सुख आणि दु:ख म्हणजे प्रकाश आणि अंधाराचा खेळ आहे. संकटाचा अंधार सरला की, चांगल्या दिवसांचा सूर्योदय होतो. त्यामुळे आई-वडिलांनी संस्कार केलेली मुले संकटात हार पत्करत नाहीत, त्याप्रमाणे सुखातही हुरळून जात नाहीत. पावसाळा हा पृथ्वीच्या सौंदर्यात भर घालणारा, तिला वैभवाचा साज चढवणारा असतो. तरी पृथ्वी शालीन असते. ख-या सौंदर्याला शालीनता शोभा देते. त्यातच तिचे बुद्धिवैभवही दडलेले असते. असेच बुद्धिवैभव पाहायला मिळाले चीनमध्ये रंगलेल्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत विजेती ठरलेल्या मानुषी छिल्लरकडे. या स्पर्धेत सर्व टप्पे पार केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा उरला होता बुद्धिकौशल्याचा. यात जी स्पर्धक ज्युरींची मने जिंकते तीच जगत्सुंदरी ठरते. 

Tanushri5: are u Marathi
Similar questions
Math, 1 year ago