Science, asked by lokeshsharma2744, 10 months ago

अन्नसाखळी व अन्नजाळे यांमध्ये काय फरक आहे?

Answers

Answered by jadhav50
22
अन्नसाखळी ( Food chain )

परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसर्‍या सजीवाकडे अन्नऊर्जेचे संक्रमण निम्नस्तरापासून ते उच्चस्तरापर्यंत होते, याला अन्नसाखळी म्हणतात. सजीवाला अन्नाची गरज असते. अन्नसाखळीत अन्न मिळविणे आणि दुसर्‍याचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते. यामध्ये उत्पादकांपासून ते सर्वोच्च उपभोक्त्यांपर्यंत अन्नऊजेंचे क्रमवार ऊर्जांतरण होत असते. परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्या आढळतात. परिसंस्थेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव एकत्र राहतात. प्रत्येक परिसंस्थेतील जैविक समाजाचे उत्पादक, भक्षक व अपघटक असे मुख्य तीन गट असतात. या प्रत्येक गटाचे आपापले विशिष्ट कार्य असते.

अन्नसाखळी हिरव्या वनस्पती किंवा स्वयंपोषित घटकांपासून सर्वोच्च भक्षकापर्यंत असते. वनस्पती स्वत:चे अन्न स्वत:च तयार करताना प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे सौरऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. यासाठी वनस्पतींकडून पाणी, कार्बन डाय-ऑक्साइड व हरितद्रव्यांचा (क्लोरोफिल) उपयोग केला जातो. यातून वनस्पती कर्बोदकांची (कार्बोहायड्रेटांची) निर्मिती करून अन्न म्हणून साठवून ठेवतात. म्हणजेच वनस्पती स्वयंनिर्मित अन्नावर जगतात व वाढतात. त्यामुळे वनस्पती उत्पादक ठरतात. तृणभक्षक प्राणी वनस्पतींचा अन्न म्हणून उपयोग करतात व वनस्पतींमध्ये साठविलेली ऊर्जा ग्रहण करतात. हे तृणभक्षक प्राणी मांसभक्षक प्राण्यांचे भक्ष्य असतात. म्हणजेच तृणभक्षक प्राण्यांकडून मांसभक्षक प्राण्यांकडे ऊर्जांतरण होते. यातच पुन्हा लहान मांसभक्षक प्राणी मोठ्या मांसभक्षक प्राण्यांचे भक्ष्य बनतात. मानव मात्र वनस्पती व प्राणी यांवर जगतो. याचाच अर्थ वनस्पती, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी व मानव हे अन्नासाठी एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. अशा अन्नसाखळीतून अन्नऊर्जा नेहमी निम्नपातळीवरील सजीवांकडून उच्च पातळीवरील सजीवांकडे संक्रमित होत जाते.

अन्नजाळे

प्रत्येक परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्या असतात. त्या परस्परसंबंधाने जोडल्या जाऊन अन्नजाळी तयार होते. परिसंस्थेमध्ये स्वयंपोषी वनस्पतींनी तयार केलेली अन्नऊर्जा एक किंवा एकापेक्षा अधिक भक्षकांद्वारे ग्रहण केली जाते. अन्नजाळी ही ऊर्जा विनिमयाची प्राथमिक स्तरापासून उच्च स्तरापर्यंतची ऊर्जा संक्रमित होणारी गुंतागुंतीची संरचना असते. एकच जीव एका परिसंस्थेत एकापेक्षा अधिक पातळ्यांवर राहू शकतो. एक भक्षक अनेक मार्गांनी भक्ष्य मिळवितो. एक जीव अनेक भक्षकांचे भक्ष्य असतो. एकाच परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्यांतील सजीव एकापेक्षा अनेक पोषण पातळ्यांमध्ये घटक असतात.

अन्नजाळीची सुरुवात उत्पादकापासून म्हणजेच हिरव्या वनस्पतीपासून होते. अन्नजाळीतील विविध अन्नसाखळ्या एकमेकींना जोडलेल्या असतात. अन्नजाळीतील सर्वोच्च पातळीवर मानव आहे; कारण तो सर्वभक्षी आहे. अनेक मार्गांनी तो अन्नजाळींमधून आपले अन्न मिळवितो. विघटक कोणत्याही पातळीवर कार्यरत असतात. वनस्पती व प्राण्यांची मृत शरीरे हा त्यांचा ऊर्जास्रोत असतो.  वेगवगेळ्या प्रकारचे सजीव वेगवेगळ्या ऊर्जा विनिमय स्तरांमध्ये एकमेकांशी संबंधित राहतात. उदा., गवताळ प्रदेशातील कुरण अन्नसाखळीत काही वेळा उंदीरसुद्धा गवत खातात. उंदराचे प्रत्यक्षपणे बहिरी ससाण्याकडून किंवा सापाकडून भक्षण केले जाते. सापांना बहिरी ससाणे खातात. गवताळ परिसंस्थेतील अन्नजाळीत पुढीलप्रमाणे अन्नसाखळ्या गुंफलेल्या आढळतात.

Answered by gadakhsanket
27
★उत्तर - अन्नसाखळी - प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक ,भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरु असतात. या आंत्रक्रियेच्या क्रमाला अन्नसाखळी असे म्हणतात.
प्रत्येक साखळीत उत्पादक , प्राथमिक भक्षक, द्वितिय भक्षक, तृतीय भक्षक ,अशा चार वा पाचहून अधिक कड्या असतात. या कड्या सरळ रेषेतेच असतात.

अन्नसाखळीतील विविध पोषण पातळ्या खालीलप्रमाणे आहेत.
◆उत्पादक ही प्रथम पोषण पातळी,
◆प्राथमिक भक्षक ही द्वितीय पोषण पातळी,
◆द्वितीय भक्षक ही तृतीय पोषण पातळी,
◆तृतीय भक्षक ही चतुर्थ पोषण पातळी.

परंतु गुंतागुंतीच्या आणि अनेक शाखा असलेल्या अन्नसाखळ्यांचा समूह म्हणजेच अन्नजाळे होय. ते सरळ रेषेत नसते. जास्तीजास्त अन्नसाखळ्या एकमेकांशी जोडल्या गेल्या की त्यांचे अन्नजाळे तयार होते.

धन्यवाद...
Similar questions