India Languages, asked by tanishk20, 5 months ago

अण्णा भाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.​

Answers

Answered by AKR369
33

Answer:

अण्णा भाऊ आठवले की, प्रथम मला अपराध्यासारखे वाटते. प्रतिकूल परिस्थितीत अण्णा भाऊंनी केलेल्या एकूण कार्य आणि अनुकुल परिस्थितीत आम्ही जोपसलेली निष्क्रियता ही समोरासमोर टाकली की पृथ्वीच्या पोटात गडप व्हावेसे वाटते. नंतर आठवते ती आण्णा भाऊंची शेहेचाळीस सालच्या सुमाराला पाहिलेली शाहिरी मुद्रा.त्या वेळी अण्णा भाऊ,दत्ता गव्हाणकर आणि अमर शेख हे ब्रम्हा-विष्णू-महेशाच्या तेजाने तळपत होते.अंगाला हात लावला तर भाजून निघेल असे वाटायचे.ते दिवस आठवले म्हणजे अण्णा भाऊंच्या वा्ङमयाचा विचार क्षणभर बाजूला राहतो,अंगावर कोसळते ती या माणसाची कडवी जिद्द.

'फकिराचा' हा भाचा आपले संबंध आयुष्यात जिद्दिने जगला.वाळवे तालुक्याचा वारसा त्याला पाळण्यात भेटयला आला.जन्माला दोनचार दिवस झाले नाहीत तोच फकीर इंग्रजांचा खजिना लुटून,घोडदौड करीत वाटेगावाला आण्णा भाऊंच्या झोपडीपुढे दत्त झाला आणि घोड्यावरून न उतरता दोन ओंजळी सुरती रुपये बाळबाळंतीसाठी देऊन पुढे गेले.त्या टापांची लय अण्णा भाऊ पुढे कधीच विसरले नाहीत.अण्णा भाऊ दोन दिवस शाळेत गेले; पण तिसऱ्या दिवशी मास्तरांनी अंगावर रूळ फेकल्याबरोबर तिडकेसरशी शाळोतून चालते झाले. अण्णा भाऊंचे पुढील सर्व शिक्षण अनुभवाच्या शाळेत झाले. अण्णा भाऊंनी अनेक कामे केली.कल्याणला त्यांनी बापाबरोबर कोळसे भरले;मुंबईत फोरीवाल्यापाठोपाठ त्यांचे गाठोडे घेऊन ते हिंडले; बापू साठेच्या तमाशात लुगडे नेसून नाचले;मोरबाग गिरणीत ते प्रथम झाडूवाले झाले(अल्पवयी असल्यामुळे इन्सपेक्टरने पाहिले तर काम जाईल या भीतीने संडासात अनेकदा लपून बसले.);पुढे त्रासन डिपार्टमेंटमध्ये कसबी कामगार बनले;त्याच सुमारास पायाच्या बॅंडेजमध्ये पत्रे लपवून संदेश पोचवणारे कम्युनिस्ट कार्यकर्ते म्हणून वीवरले.या सर्व धडपडीमध्ये दोन ओंजळी सुरती रुपये देणार फकीर अण्णा भाऊंना पुन्हा कधीच भेटला नाही.अण्णा भाऊंचे काही दोस्त पुढे थोडेफार दुरावले;संसार दुभंगला शरीर कोसळू लागले; पण दारीद्र्याशी त्यांनी केलेली दोस्ती शेवटपर्यंत टिकली.आयुष्याची ही सर्व परवड त्यांनी ज्या कलंदरी वृत्तीने व जिद्दीने झेलेली त्याला तोड नाही.त्यांचे उभे आयुष्य म्हणजे साम्यवादाने झपाटलेली एक जळती चूड होती.त्यांचे वाङमय म्हणजे त्या चुडीतून उडालेल्या काही ठिणग्या;काही पेटवणाऱ्या, काही डागणाऱ्या, काही झोंबणाऱ्या ,काही झोंबता झोंबता हसवणाऱ्या

Explanation: PLEASE MAKE ME THE BRAINLIEST

Answered by Pratham2508
1

Answer:

अण्णा बंधूंची स्थिती पुढीलप्रमाणे होती.

  • अण्णा भाऊ म्हणाले की, मला आधी अपराध्यासारखे वाटायचे.
  • अण्णा बंधूंनी कठीण परिस्थितीत पूर्ण केलेले श्रम आणि आदर्श परिस्थितीत आपली स्वतःची निष्क्रीयता यांचा विचार केला तर ते पृथ्वीच्या पोटात बुडाल्यासारखे वाटते.
  • पुढे अण्णा भाऊ जेमतेम चाळीस वर्षांचे असताना मला त्यांची शाहिरी मुद्रा आठवते. त्या क्षणी ब्रह्मा-विष्णू-तेज महेशाचा आनंद अण्णा भाऊ, दत्ता गवाणकर, अमर शेख घेत होते.
  • अंगाला हात लावला तर जळाल असे वाटले. या माणसाचा कठोर निश्चय तो ज्या प्रकारे बाजूला उभा राहतो आणि प्रेतावर पडू देतो त्यावरून दिसून येते.
  • "फकिरा" च्या पुतण्याने आयुष्यभर आपले ऋणानुबंध जपले. त्यांनी अखेर वाळवे तालुक्याच्या परंपरेचे पालन करण्यास सुरुवात केली.
  • इंग्रजांची संपत्ती चोरणारा तोच फकीर बाळाच्या जन्मानंतर दोन-चार दिवसांनी घोड्यावर स्वार होऊन भाऊ वाटेगावा अण्णांच्या झोपडीत गेला आणि न उतरता, बाळाच्या जन्मासाठी 200 रुपये देऊ केले.
  • अण्णा बंधूंना त्या टपऱ्यांचे ठोके सदैव लक्षात राहतील.
  • अण्णा बंधूंनी दोन दिवस शाळेत हजेरी लावली, मात्र तिसऱ्या दिवशी शिक्षकांनी तिडकेसरांना दोरी बांधताच ते वर्गातून बाहेर पडले.
  • अनुभव यांनी चालवलेली शाळा हे अण्णा भाऊंच्या संपूर्ण माध्यमिक शिक्षणाचे ठिकाण होते.
  • अण्णा भाऊंनी खूप काही साधलं. तो लहानपणी मोरबाग मिलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होता, इन्स्पेक्टरने त्याला पाहिल्यास नोकरी जाण्याच्या भीतीने चपलामध्ये लपून बसला होता; नंतर, त्याने ट्रासान विभागात अंगमेहनतीचे काम केले; त्या क्षणी, तो एक कम्युनिस्ट कार्यकर्ता बनला ज्याने पायाच्या पट्टीत लपलेली पत्रे वाहून नेली. साठेंच्या तमाशात बापू लुगडे सोबत नाचले. त्याने वडिलांसोबत कल्याणसाठी कोळसाही भरला.
  • दोनशे रुपये देणारा फकीर या संपूर्ण संघर्षात अण्णा बंधूंना पुन्हा भेटला नाही.
  • अण्णा बंधूंच्या काही मित्रांनी थोडेसे स्थलांतर केले, परंतु त्यांचा दरिद्र्याशी संबंध शेवटपर्यंत कायम राहिला.
  • आयुष्यात या सर्व शक्यता असूनही त्यांनी धैर्य आणि जिद्द कायम ठेवली. काही लोक हसत आहेत.

#SPJ3

Similar questions