India Languages, asked by prajaktagugale, 15 days ago

अशा एका ‘सालकर पाडा’ नावाच्या पाड्यावर

आम्ही गेलो. तेथे कारव्यांच्या किंवा बांबूच्या काठ्यांच्या

भिंती करून त्या शेणामातीने सारवून तयार केलेली खोपटी

आमच्या स्वागतासाठी हजर होती. वारल्यांच्या घरांना

लाकूड फार कमी वापरतात. मेढी, चौकटीची लाकडे व

इतर चार-सहा वासे. काही खोपटांना एवढेही लाकूड

नसते. काही खोपटी इतकी ठेंगणी असतात, की आत

जायचे म्हटले, तरी वाकून जावे लागते. आमचा एक

कार्यकर्ता लक्ष्मण सापट याचे घर असेच होते. मला नेहमी

अगदी जपून आत-बाहेर करावे लागे. बहुतेक घरे

एकदालनीच आहेत. एकच दार. कुठल्याही कारव्या अगर

कामट्या मोडल्या की खिडकी तयार! पावसापासून संरक्षण

म्हणून काही घरांवर पेंढा, तर काहींवर पळसाची पाने

घालतात. कौलारू घरे क्वचितच दिसत असत. वारल्यांच्या

घरांत रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच

नसल्यामुळे ढकलली तर कोसळून पडतील अशीच ती

खोपटी होती. खोपट्याच्या भोवताली सुमारे सहा ते नऊ

इंच उंचीचा, कडेला दगड लावून केलेला, सारवलेला ओटा

असे. आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो. प्रत्येक

खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी

माची केली होती. त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती.

खोपट्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून त्यांत

कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवले होते.

------------------------------------------------------

वरील प्रसंगातून लेखिकेने वारली लोकांच्या घरांचे जे दर्शन घडवले, त्याबद्दल तुमचे मत लिहा.​

Answers

Answered by ashaparade1234
0

Answer:

8 th stdanderd chapter ahe na

Explanation:

same to you

i will learn in 8 th std

Similar questions