India Languages, asked by kalyanisamanta714, 2 months ago

berojgari ki samasya essay in Marathi

Answers

Answered by anugupta000005
2

Explanation:

बेरोजगारी नाहीशी करण्यावरच आणखीन एक उपाय शिक्षण हा असला, तरी सध्या दिले जात असलेले शिक्षण हे व्यक्तीला स्वावलंबी बनवणारे स्वतःच्या पायावर उभे राहण्यास शिकवणारे नाही आहे ही मोठी शोकांतिका हे पुस्तकी आणि परीक्षार्थी ज्ञान आहे यामुळे फक्त कारकुनांची निर्मिती होईल यासाठी शिक्षण पद्धती अभ्यासक्रम यात आमूलाग्र बदल झाला पाहिजेत. तसेच यांत्रिकीकरणाला ही काही पर्याय शोधून काढणे महत्त्वाचे आहे. व्यवसायाभिमुख शिक्षण देणे कौशल्य कलागुण त्याला वाव देणारे आणि त्यातून रोजगाराची निर्मिती करणारे शिक्षण विद्यार्थ्यांची आवड जोपासणारे शिक्षण गरजेचे आहे त्याचं त्याचा सर्वांगीण विकास होईल आणि रोजगार निर्मिती होईल आयुष्याचे ध्येय आहे ते मनात प्रमाणे निवडण्याचे पर्याय विद्यार्थ्यावर राहील त्यामुळे बेरोजगारी आपोआपच संपुष्टात येईल.

बेरोजगारीच्या समस्येवर सर्वकष योजना तातडीने अमलात आणली नाही, तर भविष्यकालीन तरुण पिढी व्यसनाधीन व गुन्हेगारी प्रवृत्तीचे होईल. देशात अराजक माजेल म्हणून बेकारीची समस्या समाजाला गर्तेत नेणारी आहे, याची जाणीव शासनाला व पर्यायाने समाजाला होणे आवश्यक आहे.

मित्रांनो बेरोजगारी बद्दल बेरोजगारी एक भीषण समस्या निबंध Berojgari Nibandh In Marathi आपण आज बघितला आणि याचे वास्तव चित्रण आपल्या आजूबाजूला आज बघायला मिळते एकदम खरी वस्तुस्थिती आहे. आपण प्रत्येकजण हे मान्य करतो रोजगार नाही व्यवसाय नाही बाजारामध्ये मंदी आहे. अशी कारणे नित्याचीच आहे. परंतु जर तुमच्याकडे कोणते कौशल्य असेल तर ते तुमचे कौशल्य रोजगार नक्कीच तुम्हाला मिळवून देईल लाखोच्या संख्येत शिक्षण घेणारे भरपूर आहेत पण कौशल्यावर आधारित शिक्षण घेणारे नगण्य आहेत त्यामुळे याला लाखोंपेक्षा पेक्षा त्या नगण्य संख्येच्या लोकांनाच रोजगार मिळेल ही उघड वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला आवड असणाऱ्या शैक्षणिक अभ्यासक्रमाला निवडा अन् त्यातच आपली कारकीर्द करिअर निर्मिती करा. काम केल्याचा आनंद मिळेल छंद जोपासण्याचा आनंद मिळेल, काम करतेवेळी उत्साह राहील, नेहमी नेहमी शिकण्याची प्रक्रिया चालूच राहील आणि रोजगार निर्मिती सुद्धा होईल हे सांगणे न लगे तुम्हाला वरील निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला निबंधा करता कुठला विषय हवा असेल तर तेही कळवा.

Answered by nehashanbhag0729
1

Answer:

answer

बेरोजगारी ही समस्या पाहता त्याचे विश्लेषण करणे आणि त्यावर तोडगा काढणे अपेक्षित आहे. परंतु दिवसेंदिवस ही समस्या वाढतच आहे. या समस्येवर उपाययोजना म्हणून शिक्षण पद्धतीतले बदल आणि उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधी यांचा समूळ विचार केला गेला पाहिजे. तरच आपण नक्की या समस्येवर समाधान प्राप्त करू शकू!

विद्यार्थी बेरोजगारी हा शब्द ऐकतात पण त्यांच्या अनुभवात हा शब्द नसतो. या मुद्द्याचे आणि विषयाचे अतिरिक्त वाचन गरजेचे आहे. बेरोजगारी निबंध (Unemployment Essay In Marathi) लिहण्यासाठी बेरोजगारीच्या कोणत्या कारणांचा आणि उपायांचा विचार करणार आहोत याचे परिपूर्ण ज्ञान असायला हवे. बेरोजगारी हा निबंध वास्तववादी स्वरूपाचा असल्याने काल्पनिक विस्तार करू नये. चला तर मग पाहूया कसा लिहायचा, बेरोजगारी हा निबंध!

Explanation:

mark \: me \: as \: the \: brainliest \: please

Similar questions