(१) भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा.
(२) राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
3
Answers
Explanation:
स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता.
महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांसारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बार्डोली, चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले. किसान सभेसारख्या संघटना स्थापन झाल्या.
स्वातंत्र्योत्तर काळात कुळ कायद्यासारख्या कायद्यांनी शेतकरी चळवळी मंदावल्या. हरितक्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही.
शेती मालाला योग्य भाव मिळावा, कर्जमुक्ती आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात म्हणून शेतकरी चळवळी पुन्हा जोर धरू लागल्या आहेत.
हरितक्रांतीचा हेतू शेतीचे उत्पादन वाढवणे व भारतदेश अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण बनवणे हा होता; पण त्याचा फायदा गरीब शेतकर्यांना न होता उलट शेतकर्यांमध्ये गरीब व श्रीमंत असे वर्ग निर्माण झाले. या असंतोषातून आंदोलनाला सुरुवात झाली.