India Languages, asked by anandmestry771, 1 month ago


भाषण विषय-
1.माझे कुटुंब...
2.शाळेची आठवण..

PLEASE GIVE CORRECT ANSWER
IN MARATHI ( मराठी )​

Answers

Answered by vinayasontakke06
0

Answer:

Skip to content

मराठी ओ

Menu

माझे कुटुंब मराठी निबंध | Majhe Kutumb Majhi Jababdari Nibandh Marathi

24/12/2020 by Author

Majhe Kutumb Nibandh Marathi

Share via:

Facebook

Twitter

LinkedIn

More

शाळेत माझे कुटुंब मराठी निबंध नेहमी विचारला जातो आणि आपल्या मनात कल्पना ते खूपच येतात पण कसे लिहायचे, कुठून सुरुवात करावी हेच समजत नाही तर जाणून घ्या.

मेरा घर निबंध हिंदी में जानिए।

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला माझे कुटुंब माझी जबाबदारी मराठी निबंध सांगणार आहे. ह्या निबंधाने आपल्याला नक्कीच पैकी चे पैकी गुण मिळतील.

खालील निबंध कोणकोणत्या विषयांवर वापरू शकता

माझे कुटुंब निबंध मराठी

माझे कुटुंब माझी जबाबदारी निबंध

माझा परिवार

Essay On My Family In Marathi

Family Essay In Marathi

हे देखील वाचा: माझे घर निबंध मराठी

माझे कुटुंब माझी जबाबदारी निबंध मराठी | Majhe Kutumb Majhi Javabdari Nibandh Marathi

“कुटुंब किती छोटा आणि छान शब्द आहे ना परंतु कुटुंब म्हणजे फक्त दोन चार लोकं नाही तर त्या लोकांमधील प्रेम, ते मिळूनमिसळून राहणे त्याला म्हणतात खरं कुटुंब पूर्ण झाले असे.

आमच्या घरात आम्ही एकूण चार लोकं राहतो आई, बाबा, ताई आणि मी असे आमचे चार जणांचे कुटुंब आहे.

कुटुंब आपल्याला संस्कार लावते कारण आपण सर्वात आधी आपल्या कुटुंबातील लोकांकडून शिकतो आणि ते जसे वागतात तसेच आपल्यावर संस्कार होतात. लहानपणी आपल्याला कुणी शिकवत नाहीत ना शाळेत टाकतात कारण तीन वर्षाचा झाल्याशिवाय शाळेत टाकत नाहीत. तर तीन वर्षाच्या आत मुलाला जे काही शिकायला मिळते ते म्हणजे त्याच्या कुटुंबाकडून आणि सभोवतालच्या लोकांकडून त्यामुळे कुटुंब आपल्या जीवनात धडे शिकवण्यासाठी खूप गरजेचे आहे.

आमच्या कुटुंबातील मोठे व्यक्ती म्हणजे माझे बाबा ते आमच्या सर्वांची खूप काळजी घेतात. बाबा दररोज ऑफिसला जातात त्यामुळे आमच्या घरात पैसे येतात आणि आमच्या गरजा पूर्ण होतात. रोज सकाळी बाबा आणि आई देवाची पूजा करतात आणि आरती म्हणतात, अग्गरबत्ती धूप लावतात, पूजा पाठ करतात ज्यामुळे आमच्या संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि सर्व आनंदी राहतात. त्यांच्यासोबत मी आणि ताई देखील देवाची पूजा करतो त्यामुळे आमचे मन प्रसन्न होते.

माझी आई आमच्या कुटुंबातील प्रेमळ आणि दयाळू व्यक्ती आहे. आई असली घर भरलेले वाटते जर आई कुठे गेली तर आम्हाला तिच्याशिवाय करमत नाही आणि आमचे कुटुंब पूर्ण वाटत नाही. आई रोज सकाळी उठून देवाची पूजा करते त्यानंतर बाबांसाठी आणि माझ्यासाठी खाण्याचा डब्बा तयार करते. रोज घरातील कामे करत राहते म्हणजे दररोज ती स्वतःला कामात गुंतवून घेते ज्याने तिला कधीही बोर होत नाही. आई आम्हाला देखील काही कामात व्यस्त करते किंवा अभ्यास करण्यास सांगते. ती रोज आम्हाला वेगवेगळे जेवण तयार करून खाऊ घालते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक छानशी गोष्ट सांगते आणि गोष्टीचा शेवटी एक बोध देखील सांगते.

ताई आणि माझा एक स्वतंत्र रूम आहे ज्यात माझे आणि ताईचे अभ्यासाचे साहित्य राहतात. तेथे आई माझा अभ्यास करून घेते जर मला अभ्यासात काही अडचण असेल तर मला मदत करते. ताई देखील मला मदत करते जर आई कामात आहे तर मी ताईला ती शंका विचारून घेतो ती देखील मला मदत करते.

सुट्टीच्या दिवशी आम्ही सर्वजण खूप धमाल मस्ती करतो तेव्हा बाबांना सुद्धा सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी खरे आमचे कुटुंब जवळ वाटते आणि आनंदी वाटते कारण दररोज कोणी कोणत्या कामात तर कोणी कोणत्या कामात राहतात. तेव्हा आम्ही काहीतरी खेळ खेळतो, जेवण सोबत करतो कारण दिवसा कोणी घरी जेवण करत तर कोणी बाहेर जस मी शाळेत जातो. जर बाबांचे काही काम असले तर ताई आणि मी बाबांना कामात मदत करतो.

अभ्यासात माझी आई मला खूप मदत करते आणि ताई देखील करते. बाबा हि सुट्टीच्या दिवशी मला अभ्यासात मदत करतात.

कुटुंबातील सर्व जण काही काही कामे करत असतात जसे आई स्वयंपाक करते, ताई आईला मदत करते, मी घरातील काही छोटे कामे करतो, बागेतील झाडांना पाणी घालतो बाबा ऑफिसला जातात असे सर्वजण कामे करतात.

आमचे घर सुद्धा आमच्या कुटुंबाचा एक हिस्साच आहे कारण कुटुंब आपली काळजी घेतं तसेच घर देखील आपली खळजी घेत, आपल्याला राहण्याची जागा मिळते, आपल्याला विश्रांती घेण्याची जागा मिळते. घर राहिले की आपली शोभा वाढते आणि आपल्या कुटुंबाला राहण्यास जागा मिळते.

दोन सदस्य असे आहेत ज्यांचे आगमन आमच्या कुटुंबात होताच असते ते म्हणजे आणि आणि आजोबा. ते आल्यावर आमचे कुटुंब अजून खिळून जाते. त्या दिवसांत बाबांचे ते गावातील किस्से एकूण अजून भार येते आणि एक नवीनच चर्चा सुरू होते. माझी तर मज्जाच राहते कारण मला अजोबंसोबत बाहेर फिरायला मिळते, आजोबा मला संध्याकाळी आइस्क्रीम खायला नेतात आणि रात्री जेवण झाल्यावर गल्लीताच फिरायला नेतात. आजोबा मला नवणीवन गोष्टी सांगतात, काही गावातील चांगल्या गोष्टी सांगतात ज्याने मी उत्साहित होतो.

आजी मला अभ्यासात मदत करते आणि मला समजावून सांगते जर मला अडचण असेल तर ती लगेच ती अडचण दूर करते. रात्री झोपताना मला छानश्या गोष्टी सांगते त्यात रामायण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी, कृष्णाच्या गोष्टी, थोर नेत्यांच्या गोष्टी सांगते. जर मी काही चुकीचे केले तेव्हा आई मला मारते तेव्हा आजीच मला आईच्या मारपासून वाचवते आणि मला समजावून सांगते की ही गोष्ट चुकीची होती असे पुन्हा करू नको. आईचा राग शांत झाल्यावर आई सुद्धा मला जवळ घेते आणि समजावून सांगते.

Similar questions