Geography, asked by tejasdeore135, 9 hours ago

bhartatil masemari vyavsayachi mahiti liha​

Answers

Answered by rahulsindhu03201
2

nahi pata

Explanation:

par like Karo toh Dil khol karlenge to the house and I will try again later

Answered by pranalithool93
0

Answer:

मासेमारी हा मानवाचा फार पुरातन काळापासून चालत आलेला एक व्यवसाय व छंद आहे. आदिमानव अन्न मिळविण्यासाठी इतर प्राण्यांच्या शिकारीबरोबरच जलाशयातील माशांची शिकार करीत असावा. ही शिकार करण्याचे निरनिराळे प्रकार त्याच्या अनुभवावर आधारित असावेत. जाळे टाकून मासे पकडणे, भाल्याने मासे मारणे किंवा गळ टाकून मासे पकडणे याची माहिती मानवास पुरातन काळापासून असावी. इ. स. दहाव्या शतकापूर्वीपासून चिनी लोक मत्स्यसंवर्धन करीत असावेत असे दिसते. ईजिप्तमध्येही पुरातन काळापासून मासेमारी होत असावी, असे काही प्राचीन शिलाचित्रांवरून दिसून येते. या चित्रात ‘टिलापिया’ नावाचे मासे जाळ्यात पकडले जात असतानाचा देखावा आहे. भारतात सु. चार हजार वर्षांपूर्वीच्या काळातही मासेमारी अस्तित्वात होती, असे सिंधू खोऱ्यातील मोहें-जो-दडो येथील उत्खननात आढळले आहे. मासेमारीचे मचवे, बंदरातील मासे उतरविण्याच्या जागा वगैरेंचे अवशेष प्रामुख्याने दिसतात. तसेच भाजलेल्या तांबड्या मातीच्या भांड्यावर महसीरसारख्या माशांची व ते पकडण्यासाठी वापरलेल्या गळांची चित्रे आढळतात. यावरून त्या काळात मासेमारीचा व्यवसाय अस्तित्वात होता, असे मानण्यास हरकत नाही. नंतरच्या म्हणजे चाणक्य (कौटिल्य) यांच्या काळात (इ.स. पू. सु. चौथे शतक) तर मत्स्यसंवर्धन हा एक प्रस्थापित व्यवसाय असावा असे दिसते. चाणक्य यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथात असे नमूद केले आहे की, मासळीच्या उत्पन्नाच्या १/६ भाग सरकारने तळ्याची भाडेपट्टी म्हणून घ्यावा व मासळीवरच्या जकातीचा दर माफक असावा. सुक्या मासळीचा उपयोग सैन्यातील जवानांसाठी कसा करावा, हेदेखील त्यात विशद केले आहे. दुष्काळी परिस्थितीत राजेरजवाड्यांनी व त्यांच्या मित्रांनी नदी, तलाव व समुद्रकिनारी जाऊन गळाने किंवा इतर रीतीने मासेमारी करून वा करवून प्रजाजनांना अन्न पुरविण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यात नमूद केले आहे. भारतात

Similar questions