History, asked by priyuchavhan7, 5 hours ago

चले जाव चळवळीचे परिणाम​

Answers

Answered by NyashaShrivastava
1

आज ९ ऑगष्ट हा चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन दिन आहे. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. सरकारी कचेर्‍या लुटल्या, सरकारी मालमत्तेचा विध्वंस केला. जनताच जर आपल्या विरोधात अशी पेटून उठली असेल तर आपण या करोडो लोकांवर राज्य करणार तरी कसे असा प्रश्‍न ब्रिटीशांना पडला. त्यांनी भारत देश सोडून जाण्याच्या निर्णयाची प्रक्रिया सुरू केली. पाच वर्षांनी ते भारत सोडून गेले. देश स्वतंत्र झाला. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगष्ट क्रांतीमुळे निर्णायक अवस्थेत आला म्हणून या क्रांतिदिनाला महत्त्व आहे. महात्मा गांधी यांनी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर जाहीर सभा घेऊन सरकारला हा आदेश दिला होता असे मानले जाते. म्हणून आता या मैदानाला गोवालिया टँक न म्हणता ऑगष्ट क्रांती मैदान असे म्हटले जाते. आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास नीट माहिती नाही म्हणून हा इतिहास आवर्जुन सांगण्याची गरज आहे.

Similar questions