चला वाचवू वसुंधरा
माझी वसुंधरा अभियान
आयोजक
सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय, सातनूर
ता.वरुड जि. अमरावती
वृक्ष लागवड कार्यक्रम --
१५ जून ते २५ जून
वृक्षमित्र या नात्याने आयोजकांना
वृक्षलागवडीकरिता रोपांची मागणी
करणारे पत्र लिहा.
किंवा
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने 'माझी
वसुंधरा अभियानाचे आयोजन केल्याबद्दल
आयोजकांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Answers
Answer:
, ग्रामपंचायतीची निवडणूक नेमकी कशी होते, यंदा या प्रक्रियेत नेमके काय बदल करण्यात आले आहेत, याचीच माहिती आता आपण पाहणार आहे.
सुरुवातीला पाहूया आताचा ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम कसा आहे ते.
महत्त्वाच्या तारखा
एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसंच नव्यानं स्थापन झालेल्या 34 जिल्ह्यांमधल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं 11 डिसेंबरला जाहीर केला आहे.
त्यानुसार 11 डिसेंबर 2020 पासून ते निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. म्हणजे काय तर या काळात मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती किंवा घोषणा मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी करू शकत नाहीत.
तर या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असणार ते आधी पाहूया.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कालावधी- 23 ते 30 डिसेंबरपर्यंत
उमेदवारी अर्जांची छाननी - 31 डिसेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख - 4 जानेवारी
मतदान - 15 जानेवारी, वेळ 7.30 ते 5.30, गडचिरोली जिल्हा -7.30 ते 3
मतमोजणी - 18 जानेवारी please Mark Me as brainliest
कु. केतन,
विद्यार्थी प्रतिनिधी,
शिवाजी हायस्कूल,
सातनूर.
दि. १ ऑगस्ट २०२२.
प्रति,
'माझी वसुंधरा अभियान' आयोजक,
सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय, सातनूर
ता.वरुड जि. अमरावती.
विषय:- 'माझी वसुंधरा' अभियानाचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन
करणेबाबत.
महोदय,
मी आपल्या गावातील शिवाजी हायस्कूलचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे.आपली शाळा हि नेहमीच समाज उपयोगी कामात नेहमी पुढाकार घेत आलेली आहे .तसेच सांकृतिक, सामाजिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उत्तम काम करणाऱ्यांचा नेहमीच प्रोत्साहन देत आलेली आहे.
आपण केलेल्या जनजागृती कार्याचा गौरव करावा हाच या पत्राचा उद्देश आहे.
महोदय आपण नेहमीच गावाच्या विकासाचा विचार करत आलेला आहात. आपण अनेक सरकारी योजना गावात यशस्वीरीत्या राबवल्यात. गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय ठेवून दिवस रात्र काम करत आहात.असेच एक म्हणजे आपण मागील महिन्यात राबवलेले 'माझी वसुंधरा' अभियान.
या अभियानांतर्गत आपल्या गावात वृक्षलागवड करण्यात आली . गावातल्या सर्व लोकांनी यात सहभाग घेतला.
आम्हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे खूपच माहितीपूर्ण होते.आम्हा मुलांनाही आपण वृखालागवड करण्याची संधी दिलीत. यामुळे आम्हाला पर्यावरणासाठी काहीतरी हातभार लावत आहोत असा एक अभिमान वाटत होता. त्याचबरोबर आपली ग्रामपंचायत पर्यावरणाच्या बाबतीत किती सहनशील आहे याचा आम्हाला प्रत्यय आला. एक अभिमानाची भावना मनामध्ये निर्माण झाली.
याचबरोबर 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत आपण गावात आपल्या पृथ्वीवरील अनेक समस्याबाबत जनजागृती केलीत. पृथ्वी हि आपल्या मातेसमान आहे ती आपले पालनपोषण करते. आज प्रदूषण,मृदेचा ऱ्हास अश्या अनेक समस्यांनी तिला ग्रासले आहे. या सर्व गोष्टी या अभियानामार्फात लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या.
याचबरोबर आपली वसुंधरा हि स्वच्छ आणि सुंदर कशी राहील यासाठी आपण कोणते प्रयत्न करू शकतो याचीही माहिती गावकऱ्याना देण्यात आली.
हे पत्र आम्हा सर्व विद्यार्थ्याकडून तुम्हा आयोजकांचे अभिनंदन करण्यासाठी आहे. तुम्ही करत असलेले कार्य हेय गौरवास्पद आहे. तुम्ही अश्याच प्रकारे समाज उपयोगी कार्य करत राहाल याची आम्हाला खात्री आहे. यापुढील कोणत्याही कार्यात आम्हा मुलांकडून कोणतीही मदत हवी असल्यास तुम्ही त्याची कधीही मागणी करू शकता. आम्ही आमुच्या शिक्षकांना तशी मागणी केली आहे आणि त्यांनी परवानगीही दिली आहे.
आपल्या कार्याचा गौरव म्हणून येणाऱ्या शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात आमुच्या हायस्कूलने आपला एक सत्कार समारंभ आयोजित करण्याचे योजले आहे. त्याची सबंधित माहिती आपल्याला पत्राद्वारे कळवली जाईल.
पुन्हा एकदा 'माझी वसुंधरा' अभियान यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल तुमचे अभिनंदन.
आपला नम्र,
कु. केतन,
विद्यार्थी प्रतिनिधी,
शिवाजी हायस्कूल,
सातनूर.
#SPJ2