Hindi, asked by priyankaadhangale, 3 months ago

eassy on my family picnic in marathi. plz help tomorrow is my oral

Answers

Answered by Anonymous
6

Explanation:

आजच्या जीवनामध्ये मानवाला करमणुकीची आवश्यकता आहे. कारण सर्व लोक हे दररोज काम करून कंटाळतात आणि त्यांना काळजीपासून दूर राहण्यासाठी करमणुकीची आवश्यकता असते.

या सर्वांपासून दूर होण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे – सहल. आपण सर्वानी वेळेच्या नुसार सहलीची योजना बनविली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला रोज – रोज काम करून खूप कंटाळा येतो म्हणून कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करतात.

कोणी दोन दिवसांची सुट्टी घेऊन जातो, तर कोणी एक आठवडा सुट्टी घेतात. बरेच लोक हे नैसर्गिक, डोंगराळ भागात किंवा बागांमध्ये अशा ठिकाणी जातात.

आमची सहामाही परीक्षा संपली होती आणि आम्ही परिश्रम करून खूप थकलो होतो. म्हणून आमच्या शाळेतील शिक्षकांनी आमच्यासाठी सहलीला जाण्याचा निर्णय घेतला. हे ऐकताच आम्ही सर्वजण आनंदाने नाचू लागलो. वर्गामध्ये सहलीविषयी करायची तयारी या संदर्भात चर्चा करण्यात आली.

तसेच कर्तव्ये सुद्धा सुरु झालीत. सर्व मुलांचे चार – पाच गट तयार करण्यात आले. खाद्य पदार्थांचे नियोजन करण्यात आले. तसेच स्वयंपाकाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली. सहलीच्या आदल्या दिवशी एका गटाने भांडीची व्यवस्था केली, दुसऱ्या गटाने फळे, भाज्या व इतर खाद्य पदार्थांची खरेदी केली.

Similar questions