Hindi, asked by yerolepallavi, 5 months ago

घनदाट जगल-बाघ आणि त्याचं पिल्लू-पिल्लाला बोलायला शिकवण्यासाठी
माजराची नेमणूक-म्याँच म्याँव शिकवण्याचा प्रयत्न-बाघोबा वैतागतो- आता शिकवायला गाढवदादा
येतात ते खिकाळायला सुरुवात करतात-पुन्हा वाघोबाचा वैताग आणि पिल्लू हैराण -तिसऱ्या वेळी
बैलाची नेमणूक - बाघोबाचा वैताग वाढतो- एके दिवशी पिल्लू जंगलात फिरते-दबा धरून बसलेला
शिकारी--पिल्लावर संदुकीचा नेम धरतो - पिल्लू त्याला पाहते आणि डरकाळी कोडते-शिकारी धूम
ठोकतो-पिल्लाला आपली भाषा आली म्हणून वाघोबा खूश.​ story writing

Answers

Answered by mad210216
2

कथा लेखन.

Explanation:

  • वाघाचे पिल्लू.
  • एका गावात एक घनदाट जंगल होते. त्या जंगलामध्ये विविध प्राणी राहायचे. तिथे एक वाघ राहायचा,पण त्याचा पिल्लू अजूनही काही बोलत नव्हता.
  • त्याला बोलायला शिकवण्यासाठी वाघाने वेगवेगळे उपाय केले.एक दिवशी वाघाने मांजरीला बोलावले. मांजरीने वाघाला म्याँच म्याँव बोलायला शिकवण्याचा प्रयत्न केले. पण, पिल्लू काही शिकला नाही.
  • वाघाने वैतागून गाढवाला बोलावले. गाढवाने खिकाळायला सुरुवात केली. परंतु, पिल्लू तरीही काही शिकला नाही.
  • तिसऱ्यांदा वाघाने बैलाला बोलावले. बैलाने हंबरायला सुरुवात केली. तरीही पिल्लू काहीच बोलायला शिकला नाही, ज्यामुळे वाघाचा वैताग वाढत जातो.
  • काही दिवसांनी वाघाचा पिल्लू जंगलात एकटा फिरत असतो. तेव्हा, तो एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकतो. शिकारी त्याला मारण्यासाठी त्याच्यावर बंदूकीचा नेम धरतो. तेव्हा पिल्लू खूप घाबरतो आणि भीतिमुळे जोरात डरकाळी फोडतो.
  • पिल्लाची डरकाळी ऐकल्यावर वाघ त्याला वाचवण्यासाठी तिथे पोहचतो. वाघाला पाहिल्यावर शिकारी तिथून पळत सुटतो.
  • पिल्लाला आपली भाषा आली म्हणून वाघोबा खूश होतो आणि पिल्लाला तो प्रेमाने मिठी मारतो.
  • तात्पर्य: कठीण प्रसंगांमध्येच माणसाची खरी क्षमता दिसून येते.
Similar questions