History, asked by yashwantshinde664, 17 days ago

gova mukti samititil Maharashtrache satyagrahi please answer quickly​

Answers

Answered by Deepakwadhekar
1

Explanation:

गोवा मुक्ती संग्रामात महाराष्ट्राने मोलाची साथ दिली हे त्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांवरूनच दिसून येतं. शिवाय यात विविध विचारांच्या व्यक्ती एकत्र आल्या होत्या.

उजव्या-डाव्या, समाजवादी अशा विविध विचारधारांमधील अनेक कार्यकर्ते गोव्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, या एकमताने एकत्र येऊन आपापल्या पद्धतीने स्वतःला वाहून घेत होते.

महाराष्ट्रातून असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या तुकड्या वारंवार गोव्याच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होत्या. पुण्यात 'गोवा विमोचन समिती'ची स्थापना झाली. यात एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, सेनापती बापट, पीटर अल्वारीस, पं. महादेवशास्त्री जोशी, केशवराव जेधे, मधू दंडवते, जयंतराव टिळक, वसंतराव तुळतुळे, हिरवे गुरुजी आदींचा सहभाग होता.

विशेष म्हणजे संगीतकार सुधीर फडके देखील गोवा मुक्ती संग्रामात हिरीरीने सहभागी झाले होते. 1955 साली सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली पहिली तुकडी गोव्याला रवाना झाली आणि त्यानं गोव्याच्या हद्दीवरच पोर्तुगीजांनी अटक केली. त्यानंतर एकामागे एक स्वातंत्र्यसैनिकांच्या तुकड्या येतच राहिल्या.

नियोजनबद्धरितीने आंदोलन सुरु राहिले. गोव्याच्या सर्व सीमा या स्वातंत्र्य सैनिकांनी व्यापून टाकल्या होत्या.

Similar questions