Social Sciences, asked by munnakabutar856, 1 day ago

होळी या सणाची सविस्तर माहिती लिहा. तसेच. होळी हा सण साजरा करताना पर्यावरणाची व स्वत:ची काळजी तुम्ही कशी घ्याल ? ते तुमच्या शब्दांत लिहा.​

Answers

Answered by Antaradj
1

Answer:

वेगवेगळ्या मान्यतेनुसार होळीला वेगवेगळी मान्यता आहे. होळी का साजरी केली जाते याला पौराणिक तसेच अन्य कारणं देखील आहे. वाईटावर चांगल्याचा विजय मिळवायचा हा काळ असून, करोना संक्रमण काळाचा देखील खात्मा करूया आणि या वर्षीच्या होळीला करोनाचा विनाश करणारी होळी असे कारण देऊया. होलिका दहनाचे पौराणिक व सांस्कृतिक महत्त्व आपल्याला माहिती आहे.

हिरण्यकश्यप आणि विष्णू भक्त प्रल्हादाची कथा आपल्या सर्वांना माहीतच आहे, पौराणिक मान्यतेनुसार हिरण्यकश्यपने आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने आपल्या मुलाचा आठ दिवस अनन्वित छळ केला होता. परंतु, भगवान विष्णूची प्रल्हादावर इतकी कृपा होती की, प्रत्येक वेळी त्याचा या संकटातून बचाव झाला. आठव्या दिवशी प्रल्हादाची आत्या होलिका तिच्या मांडीवर प्रल्हादास घेऊन जळत्या अग्नीत बसली होती. होलिकाला अग्नीने न जाळण्याचा आशीर्वाद दिला होता. परंतू, भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादाचे प्राण पुन्हा वाचले आणि होलिकाच मरण पावली. तेव्हापासून दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टकच्या वेळेस कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. आणि या घटनेनंतर वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याने होलिका दहनाचा हा उत्सव सर्वत्र साजरा होऊ लागला. अशीच शिव पार्वती, कामदेव यांची देखील कथा आहे.

होळीनंतरचा दुसरा दिवस म्हणजे रंगाचा खेळ धुळवड साजरा करण्यामागे राधाकृष्णाची कथा सांगितली जाते. अशी मान्यता आहे की, जेव्हा कृष्णाला राक्षसीने विषारी दूध पाजलं तेव्हा त्याचा रंग निळा पडला होता. मोठं झाल्यावर कृष्णाने आपल्या रंगाला पाहिलं तेव्हा त्याला शंका आली की आपल्या अश्या दिसण्यामुळे राधा आणि इतर गोपिका आपल्याशी बोलणार नाही तेव्हा ही शंका त्याने यशोदामाते जवळ व्यक्त केली. त्यावेळी यशोदामातेने सांगितले की असं कर तूला आवडणारा रंग घे आणि राधेला लावून ये यानंतर कृष्णाने मातेचं हे बोलणं ऐकून राधेला खरंच रंग लावला आणि तेव्हापासूनच त्यांच्या प्रेमाची सुरवात झाली आणि रंगाचा हा उत्सव साजरा होऊ लागला असं म्हटलं जातं.

होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ. हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा वेळ. निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ. थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सूस्त झालेले असते. यामुळे शारिरीक थकवा आल्यासारखे वाटत असते. वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते. होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो. थंडीमुळे सूस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा, यासाठी होळी साजरी केली जाते.

करोना काळात या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी घरच्या घरी नियोजन करा. बाहेर गर्दी करू नका, निसर्गचक्रानुसार सर्व सण व उत्सव आपल्याला साजरे करता यावे याकरीता होळी सणाचा उपयोग करूया आणि चांगल्यावर वाईटाचा विजय मिळवूया.

Explanation:

make me brain list answer

Similar questions