India Languages, asked by jayashreebirje, 1 year ago

I need Marathi essay on Rain

Answers

Answered by tallapureddytej
2
पाऊस पावसाचे चक्र पाऊस — ब्राझील. वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पडणारे पाण्याचे थेंब. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने (संपृक्त saturated झाल्याने) पाऊस पडतो.

पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन किमी पाऊस पडतो, त्यातील ३९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो. पावसाची झड संततधार अखंडपणे किंवा अत्यल्प खंडाने,पण बारीक थेंबात पाऊस पडणे यास 'झड लागणे' म्हणतात. ही झड भारतातील महाराष्ट्र राज्यात साधारणत: श्रावण महिन्यात असते. नागपंचमी व पोळ्यादरम्यान ही लागते असा अनुभव आहे. याचा कालावधी तीन दिवस अथवा कधीकधी सात दिवसही असतो. अशा झडीचा शेतीला फायदा होतो पण क्वचित प्रमाणात नुकसानही होते. ओला दुष्काळ पडतो.





Answered by Mandar17
0

पावसाळा या विषयावरती काही बोलायच म्हटलं तरी मन शहरून येते.पावसाळा हा सर्व ऋतूंचा राजा आहे.टप-टप पडणारे पाण्याचे थेंब, काळेकुट्ट आभाळ, बेडकांचे आवाज आणि विजांचा गडगडाट हे सर्व ऐकतानाच खूप मजा येते.पाऊस सुरु झाल्यानंतर हातात चहा घेऊन खिडकीजवळ उभा राहून पावसाला बघत राहणे. थंड हवेच्या झुळूकेसोबत पाण्याचे आतमध्ये येणार्‍या थेंबांचा आस्वाद घेणे. या पेक्षा दुसरे सुख कोणते असेल बरे!

पावसाळा आपल्याकडे जवळपास जून माहिन्यात सुरू होतो.त्यावेळी तापलेल्या मातीवर जेव्हा थंड थंड पाण्याचे थेंब पडतात तेव्हा तो मातीचा सुगंध ज्याला आपण सौरभ म्हणून समजतो त्या वासाची तुलना जगातील कोणत्याच वासाची करता येणार नाही.पावसाळ्यात नद्या,नाले,ओढे अगदी तुडुंब भरूनवाहत असतात.त्यात पोहणे आणि मासे पकडणे हा छंद खूप सार्‍या लोकांना असतो.गणपती,गोपाळकाला असे अनेक सण या पावसाळ्यातच येतात.पावसाळ्यात खरी मजा येते तेव्हा जेव्हा अचानक घरातील वीज जाते.आणि विजांच्या कडकडाटात व घाबरलेल्या आविर्भावात आजीकडून भूतांच्या गोष्टी ऐकाव्यशा वाटतात.ते देखील चादरीत झोपून!

पाऊस जवळपास 4 महिन्यांनातर म्हणजेच सप्टेंबर किवा ऑक्टोबर मध्ये संपतो.पाऊस संपल्यानंतर सगळं मस्त वाटतं. धुराने आणि धुळीने माखलेल्या झाडांना नॅच्युरल बाथ मिळतो आणि आपल्याला नवीन रंग दिसू लागतात. आणि तो जगण्याची नवी अशा देतो निसर्गाला आणि आपल्याला.

धन्यवाद

Similar questions