Information about pandit jawaharlal nehru in marathi
Answers
Heya!!!
Here's ur and..
महात्मा गांधीच्या विचारधारेशी सावलीप्रमाणे उभे राहणारे पं. नेहरू प्रेमळ व हाडाचे देशभक्त होते. आपल्या घरच्या ऐश्वर्यापेक्षा देशाच्या स्वातंत्राच्या वैभवावर त्यांचे लक्ष वेधून होते. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास सहन केला. स्वराज्यासाठी सायमन कमिशनला विरोध करण्याचा कार्यक्रमात त्यांनी लखनौला लाठीमार सहन केला. ते आपल्या निश्चयाला चिकटून राहीले. निस्सीम देशभक्तीमुळे ते १९२९ च्या कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांनी स्वातंत्रासाठी अहोरात्र कष्ट घेतले. १९४७ साली भारताला स्वातंत्र मिळाले. स्वतंत्र भारताचे ते पहिले पंत्रप्रधान झाले. सतरा वर्ष त्यांनी भारताचे पंत्रप्रधान म्हणून काम केले. भारताचा आधुनिक विकासासाठी, देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळण्यासाठी व देशाचा भवितव्यासाठी त्यांनी स्वतः ला त्या कार्यात झोकून दिले होते.
देशाप्रमाणेच जगाला शांततेचा संदेश देऊन ‘पंचशील’ ही लाख मोलाची देणगी समस्त जगाला दिली. ‘शांतीदूत’ हि पदवी बहाल करून या राष्ट्र पुरुषास सम्मानित करण्यात आले. ते लहान मुलावर जिवापाड प्रेम करत. लहान मुले त्यांना खूप आवडत. मुले देशाचे आधारस्थंभ आहेत ही जाणीव त्यांच्या ठायी होती. २७ मे १९६४ रोजी या थोर पुरुषानेआपणा सर्वांचा निरोप घेतला. आकाशातील ताऱ्यांमधून एक तेजस्वी तारा निखळला......
Hope may help....
Answer :
काका नेहरू मुलांना फार आवडतात. म्हणून त्याचा वाढदिवस बालदिवस म्हणून साजरा केला जातो. ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद, भारत येथे झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू त्या काळी प्रसिद्ध वकील होते. त्याची आई स्वरूप रानी नेहरू होती. नेहरू काश्मीरच्या सारस्वत ब्राह्मणांच्या वंशातील होते. त्यांचे शिक्षण लंडनमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये झाले आणि त्यांनी केंब्रिज विद्यापीठात सराव केला.
डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १ 194 2२-१-1946 in मध्ये अहमदनगर किल्ल्यातील अहमदनगर येथे कारावास असताना लिहिले होते. नेहरूंना इतर भारतीय नेत्यांसह भारत छोडो चळवळीत भाग घेतल्याबद्दल तुरूंगात टाकण्यात आले होते आणि यावेळी त्यांनी भारताच्या इतिहासाबद्दलचे आपले विचार व ज्ञान लिहून ठेवले. १ 194 66 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाल्यापासून हे पुस्तक भारतातील उत्कृष्ट म्हणून मानले जाते आणि स्वातंत्र्यासाठी लढणार्या उदारमतवादी भारतीयांच्या नजरेतून पाहिले गेलेले भारतीय इतिहास, तत्वज्ञान आणि संस्कृती यांचे विस्तृत दर्शन दिले जाते.