India Languages, asked by Anonymous, 7 months ago

जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे?

only if you know marathi so u answer my question......​

Answers

Answered by Anonymous
74

Explanation:

Hello Dear ☺️

1) भिन्नधर्मीय लोकात आपण मिसळले पाहिजे.

2) परस्परांच्या सन उत्सवात सहभागी झाले पाहजे.

3) एकमेकाच्या चालीरीती सद्विचार एकमेकांनी स्वीकारले पाहिजे.

please Mark as BRAINLIEST ❤️

Answered by Anonymous
58

Answer:

मुस्लिम समाजातील केवळ मागास जातींना आरक्षण न देता संपूर्ण मुस्लिम समाजालाच आरक्षण देण्याची मागणी किती संवैधानिक आहे याचा विचार झाला पाहिजे. संविधानाच्या आधारे हक्काची मागणी करताना कर्तव्य व जबाबदारीचे उत्तरदायित्वही स्वीकारले गेले पाहिजे. जमातवाद हा मानवतेसाठी नेहमीच शाप ठरला आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिमांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी विविध समित्या, आयोग आणि अभ्यासगटांची स्थापना करण्यात आली. परंतु त्यांनी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी मात्र झाली नाही. १९५५ची काकासाहेब कालेलकर समिती, मंडल आयोग, गोपाल सिंह समिती यापासून ते न्या. सच्चर समिती व न्या. रंगनाथ मिश्रा आयोगापर्यंतच्या अहवालांत मुस्लिम समाजातील मागास जातींचा उल्लेख आहे. परंतु मुस्लिम समाजातील एक विशिष्ट प्रवाह, राजकीय दृष्टिकोन आणि हिंदुत्ववाद्यांच्या भूमिकेमुळे मुस्लिम मागासांचा प्रश्न नेटक्या पद्धतीने सोडवण्याचे प्रयत्न झाले नाहीत.

या पार्श्वभूमीवर हुमायून मुरसल यांच्या लेखातील (मटा २१ जानेवारी) विश्लेषणात काही तथ्य असले तरी त्यांनी मूलभूत वास्तवाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. मुस्लिम समाजाचे प्रश्न हे अनेकांगी आहेत. गुंता सोडवण्यासाठी या सर्व अंगांचा एकत्रित विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी मुस्लिम नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याचीही गरज आहे. मुस्लिमांचे प्रश्न टिकून राहाण्यातील, किंबहुना ते वाढवण्यातील राज्यकर्ते व हिंदुत्ववाद्यांची भूमिका विशद करून मुरसल ‘डाव्या-पुरोगामी पक्ष-संघटनांची बोटचेपी भूमिका याला कारणीभूत आहे,’ असे म्हणतात. मात्र मुस्लिम मागासलेपणास ते मुस्लिम जमातवाद, अश्रफांची भूमिका हे घटक कसे कारणीभूत आहेत याची मीमांसा करीत नाहीत. लेखक म्हणतात, ‘महात्मा फुले व डॉ. आंबेडकरांनी जुन्या शतकामध्ये आरंभलेले कार्य देशात सुफी व इस्लामने सातव्या शतकापासून केलेले दिसते. इस्लाम हा वास्तविक समाजपरिवर्तन करू इच्छिणाऱ्यांचा नैसर्गिक मित्र असताना त्याला हिंदूंचा शत्रू म्हणून उभारण्यात आले.’ हा प्रश्न निर्माण का झाला, तर इस्लामला जातीयता मान्य नसली, तरी भारतीय मुस्लिम समाजात ती आहे.

I hope this answer is help you

or aapko ya answer achha lage tu please thanks boln

thanks for your question

Similar questions