India Languages, asked by bandrinusrat, 6 hours ago

कौणीही त्याची आठवण केली नाही ( होकरथी करा )​

Answers

Answered by gyaneshwarsingh882
0

Answer:

Explanation:

आई तुझी आठवण येते.

पन्नास वर्षांपूर्वी वसई येथून मी आणि मााझा मामा त्याच्या मित्रांसह न्यू इंग्लिश स्कूल येथे सायकलवरुन बाळ कोल्हटकर लिखित 'दुरीतांचे तिमिर जावो' हे नाटक पहावयास गेलो होतो. दिगूच्या भूमिकेतील भालचंद्र पेंढारकर यांनी 'आई तुझी आठवण येते' हे नाट्यगीत असं काही आळवलं की, आम्हा प्रेक्षकांचे डोळे पाणावले.

आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचं मिलन. माझ्या आईनं मला सांभाळण्यासाठी तिला आलेल्या शिक्षकी पेशाची नोकरी धुडकावली होती. वडिलांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी घरच्या घरीच वडिलांसह शिकवण्या घेत असे. गरीब विद्यार्थ्यांना तर फुकट शिकवत असे. आम्हा दोघा भावंडाना जी संस्काराची शिदोरी आणि आर्शीवाद दिले गेले, त्याच पुण्याईवर आम्ही जगत आहोत. वयाच्या ७७व्या वर्षी म्हणजे २००८च्या कांदेनवमीच्या दिवशी आईला हृदयविकाराच्या झटका येऊन ती अनंतात विलीन झाली.

आम्ही आमच्या नोकऱ्या करु शकलो ते आई- वडिलांनी आमची मुलं सांभाळली म्हणीनच. आज जर माझी आई असती तर माझ्या चार वर्षाच्या नातीला संध्याकाळी सांभाळण्याची मला गरज पडली नसती. मला माझ्या नातीमध्ये आई दिसते, म्हणून तिला कोणीही रागावलेलं मला चालत नाही. आजसुद्धा मला आईची आठवण आली आणि घरात कोणी नसलं की, मी युट्यूबवर 'आई तुझी आठवण येते' हे नाट्यगीत लावून रडून मोकळा होतो. बाळ कोल्हटकर ज्यांना छोटा गडकरी संबोधले जाते त्यांनी लिहिलेल्या या गाण्याला भालजी पेंढारकरांनी आपल्या दर्दभरी गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः रडवलं. मातृसुखाला पारखे असलेलं हे गाणं ऐकून आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एवढी जादू या गाण्यात आहे. अशा या गाण्यातील ओळी पुढीलप्रमाणे...

Similar questions