India Languages, asked by sonu14090, 3 months ago

कोरोना विषाणू नसता तर... निबंध​

Answers

Answered by vedika200966
3

Answer:

देशातल्या काही शास्त्रज्ञांच्या मते याचं उत्तर होकारार्थी आहे. नवीन गणितीय प्रारुपाच्या आधारे त्यांनी म्हटलं आहे की, भारतात सप्टेंबर महिन्यातच संसर्गाचा उच्चांक गाठला गेला होता आणि पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत कोरोना आटोक्यात येईल. आता हे प्रारुप मांडताना चार गोष्टी गृहीत धरल्या गेल्या आहेत- लोक मास्क वापरतील, मोठ्या प्रमाणात गर्दी करणं टाळतील, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाईल आणि हात सतत धुतील.

भारतात आतापर्यंत कोव्हिड-19 चे जवळपास 75 लाख रुग्ण आढळले असून 1 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र जागतिक आकडेवारीचा विचार करता इतर देशांमध्ये झालेल्या मृत्यूच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचं प्रमाण 10 टक्केच आहे.

भारतातील कोव्हिड-19 रुग्णांचा केस फॅटलिटी रेट (CFR) किंवा मृत्यूदर हा दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. जागतिक आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाणही नीचांकी आहे.

कोरोना

वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?

वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?

वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?

वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग

वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?

लाईन

सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला. या महिन्यात देशात कोरोनाचे दहा लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आढळले. त्यानंतर मात्र कोरोनाचे रुग्ण आढळण्याचा आलेख कमी होत गेला.

गेल्या आठवड्यात भारतात कोरोनाचे दिवसाला सरासरी 62 हजार रुग्ण आढळत होते आणि 784 जणांचा मृत्यू झाला होता. बऱ्याचशा राज्यात दररोज होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी होत आहे. देशात दिवसाला सरासरी एक लाख चाचण्या होत होत्या.

कोरोना व्हायरस

या नवीन गणितीय प्रारुपाचा अभ्यास करण्यासाठी सरकारनं नेमलेल्या सात शास्त्रज्ञांपैकी एक आहेत डॉ. गगनदीप कांग. त्या स्वतः मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत आणि रॉयल सोसायटी ऑफ लंडनच्या फेलो म्हणून निवड झालेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत.

या प्रारूपामध्ये लोकांना संसर्ग होण्याचं प्रमाण, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण, मृत्यूदर आणि ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं ठळकपणे दिसून येत आहेत अशा रुग्णांचं प्रमाण याचा अभ्यास केला गेला. ज्यांच्यामध्ये कोरोना संसर्गाची लक्षणं दिसून आली नाहीत, अशा रुग्णांचं प्रमाणही या अभ्यासात लक्षात घेतलं गेलं.

कोरोना संसर्ग

फोटो स्रोत, GETTY IMAGES

जर मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर केला गेला नसता, तर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आतापर्यंत एक कोटी 40 लाखांहून अधिक झाली असती आणि आतापर्यंत 26 लाखांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले असते. मृतांचा हा आकडा सध्याच्या आकडेवारीच्या 23 पट आहे.

शास्त्रज्ञांनी बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये अभ्यास केला. स्थलांतरित मजुरांचे लोंढे या दोन्ही राज्यांमध्ये आल्याने कोरोना संसर्गावर काय परिणाम झाला, हे त्यांनी अभ्यासलं. स्थलांतरित मजुरांच्या परतण्याचा कोरोना संसर्गावर फारसा परिणाम झाला नसल्याचा निष्कर्ष समोर आला.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, हैदराबादमध्ये प्रोफेसर असलेले माथुकुमल्ली विद्यासागर सांगतात, "आपल्याकडे जून महिन्यातच 'पीक' आला असता. आपल्या रुग्णालयांवर याचा ताण पडला असता आणि लोकांमध्ये घबराट पसरली असती. लॉकडाऊननं कोरोनाचा कर्व्ह फ्लॅट करण्यात मदत केली."

प्रोफेसर विद्यासागर रॉयल सोसायटी ऑफ लंडनचेही फेलो आहेत.

पण आता आपल्याकडे सणासुदीचे दिवस आहेत. या काळात लोक एकत्र येतात, आपल्या गावी जाण्यासाठी प्रवास करू शकतात. त्यामुळे एखादा 'सुपरस्प्रेडर' आणि लोकांच्या एकत्र येण्यामध्ये वाढ झाली, तर दोन आठवड्यांमध्ये कोरोना संसर्गाचं चित्र बदलू शकतं. केरळमध्ये असंच काहीसं झालं. इथे ओणम सणानंतर कोरोनाच्या संसर्गात वाढ झालेली पाहायला मिळाली.

महिला

फोटो स्रोत, GETTY IMAGES

जर लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर कोरोनाचा स्पाइक पाहायला मिळेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. लोकांनी खबरदारी घेतली नाही तर ऑक्टोबरमध्ये 26 लाख रुग्णसंख्येचा टप्पा गाठत देशात कोरोना संसर्गाचा 'पीक' येऊ शकतो.

प्रोफेसर विद्यासागर म्हणतात, "जर लोकांनी सुरक्षाविषयक उपाययोजनांचं पालन केलं, तरच आमचे निष्कर्ष योग्य ठरतील. आमच्यामते देशात सप्टेंबरमध्येच कोरोनाचा 'पीक' येऊन गेला आहे. पण आपण हलगर्जीपणा करणं योग्य नाहीये. जे झालं ते झालं, आता काही वाईट घडणार नाही असं मानणं मनुष्यस्वभाव आहे."

कोरोना व्हायरस

Similar questions