India Languages, asked by bhagya218, 8 months ago

कथालेखन : (80 ते 90 शब्द)
• पुढे दिलेल्या मुद्द्यांवरून गोष्ट लिहा, योग्य शीर्षक देऊन तात्पर्य लिहा .
[मुद्दे : एक मुलगा - आईबरोबर झोपडीत राहणे - पावसाळ्याचे
पाऊस - रेल्वे रूळ उखडणे - त्याच्या नजरेत येणे - अंगातला लाल
थांबवणे - प्रवाशांचा संताप - ड्रायव्हरची रुळांवर नजर पडणे - रूळ उखड
प्रवाशांचे प्राण वाचणे - राष्ट्रपतींद्वारा मुलाचा सन्मान – तात्पर्य.]in marathi​

Answers

Answered by priyankasapkale242
145

Answer:

एक सुंदर छोटसं गाव होतं. त्या गावात छान नदी, डोंगर आणि एक छोटसं जंगलही होतं. त्या जंगलात अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी राहात होते. अशाच त्या गावात एक पिंटू नावाचा मुलगा राहात होता. पिंटू रोज त्याच्या घरातील आणि गावातील गुरांना रानात चरायला नेत असे. त्याच्या गावाजवळूनच एक रेल्वेही रोज जात असे. जेव्हा पिंटूची ती गुरं रानात चरत असत तेव्हा भीमा त्या येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेला न्याहळत तिची गंमत बघत बसायचा. पण तो रानात गुरं चरायला नेई तेव्हा हाच रेल्वेचा रूळ ओलांडून जावं लागत असे. एक दिवस तो रोजच्या प्रमाणे गुरांना घेऊन रानात जात होता. रेल्वे रूळ ओलांडताना पिंटूच्या असे लक्षात आलं की, रेल्वे रूळ तुटला आहे. हे पाहून तो घाबरला. त्याला काय करावं ते सुचेना. कारण जरावेळाने तेथून एक रेल्वे जाणार होती. त्यामुळे तो जास्त घाबरला. शांतपणे विचार केल्यावर त्याला एक युक्ती सुचली. त्याने पटकन त्याच्या अंगातील लाल रंगाचा बनियन काढला आणि तो काठीला बांधला. तो उंच हात करून त्या दिशेने येणाऱ्या रेल्वेला दाखवू लागला. ते पाहताच मोटरमननला जाणवलं की, पुढे काहीतरी धोका आहे. त्यांनी लगेच गाडीचा वेग कमी केला आणि पुढील अनर्थ टळला. अशा प्रकारे पिंटूने अनेकांचे प्राण वाचवले. त्याच्या समयसूचकतेमुळे आणि धाडसामुळे अनेकांना जीवदान मिळालं. गावातील लोकांनी पिंटूच्या धाडसाचं कौतुक केलं.

तात्पर्य- कठीण प्रसंग आल्यावर घाबरून जाण्यापेक्षा समयसूचकता दाखवल्यास आपण त्यावर मात करू शकतो.

Answered by nooree321
0

ne bhi nhi kar sakte hain na hai kya baat par roti ka sabji hai kya tu bata do din se baat hai yaar sara jibon ta ea az all of the point where I

Explanation:

sh a n u hai na tu bhi yaad hai kya tu ne in sab ko hai kya baat par hasi aagai me know when I was not

Similar questions