Math, asked by laxmipol, 21 days ago

लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांचे भावनिक रूप स्वमताने लिहा​

Answers

Answered by jagruti6551
5

Answer:

आयुष्यात असा एखादा प्रसंग येतो कि ज्यात पूर्ण आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद असते. अशा प्रसंगात आपण काय निर्णय घेतो ह्यावर पुढली दिशा ठरलेली असते.

अनुराधा प्रभुदेसाई एक मध्यम वर्गीय, आपली नोकरी, आपलं कुटुंब ह्यात रमलेली.. एक सामान्य स्त्री.. २००४ ला सुट्टीत फिरायला कारगिल ला जाते, द्रास इथून प्रवास करत असताना भारतीय सेनेचा एक बोर्ड तिचं लक्ष वेधून घेतो त्यावर लिहिलेलं असतं.

अनुराधा प्रभुदेसाई

I ONLY REGRET THAT I HAVE BUT ONE LIFE TO LAY DOWN FOR THE COUNTRY.

ते शब्द कुठेतरी त्यांच्या मनात खोलवर रुजतात. चौकशी केल्यावर त्यांना कळते कि, “आप को पता नही यहां तो हजारो लाशे गिरी थी” हे शब्द त्यांना आतून कुठेतरी अस्वस्थ करतात.

आपलं मुंबई मधलं एक सुखवस्तू आयुष्य जगताना ज्या देशात आपण रहातो त्याच्या दुसऱ्या भागात काय झालं ह्याची सुतराम कल्पना मला नाही!!!

१९९९ कारगिल मध्ये भारत – पाकिस्तान ह्यामध्ये युद्ध झालं; पण मुंबई मध्ये त्याची झळ काही जाणवली नाही. ती जाणवली नाही कारण अवघ्या २० ते २५ वयोगटातील तरुण मुलांनी इकडे रक्त सांडलं.

यांनी आपल्या जीवाचा त्याग ह्या देशाची इंच इंच भूमी वाचवण्यासाठी केला म्हणून आज आपण इकडे येऊ शकलो.

ह्या विचाराने अनुराधा प्रभुदेसाईंचं मन आतून कुठेतरी त्यांना विचारू लागतं कि, तू काय करू शकतेस?….

मग त्यांनी कारगिलच्या विजय स्तंभाच्या इथेच शप्पथ घेतात, “त्या तरुण सैनिकांचं बलिदान मी वाया जाऊ देणार नाही. ह्या सैनिकांचं बलिदानाची गाथा मी सामान्य नागरिकांपर्यंत नक्की पोहचवेन. त्या शिवाय पुढची पाच वर्ष मी कारगिलला नियमित भेट देत राहीन. “

Similar questions