Hindi, asked by jhajanhavi1, 5 hours ago

माझा आवडता सण यावर निबंध शलहा.(l am from st.lawrence school borivali kalyan)​

Answers

Answered by MathCracker
8

प्रश्न :-

माझा आवडता सण यावर निबंध शलहा.

उत्तर :-

  \bold{\large{ \red{दिवाळी  \: |  \: माझा  \: आवडता  \: सण  \: }}}

आपल्या भारतात सगळ्या प्रकारच्या धर्मा ची लोक राहतात त्यामुळे वर्ष भर आपल्याकडे सण साजरे होत असतात असाच एक सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा हिंदू धर्माचा एक मुख्य सण आहे आणि तो पूर्ण भारत भर खूप उत्सासाहाने जरा केला जातो.

दिवाळी हा सण अश्विन महिन्यात येतो. दिवाळी च्या ह्या महिन्या मदे सर्व शाळेला सुट्टी असते त्यामुळे सर्व मुलांना सुट्टी असते. या सुट्टी मदे सगळे दिवाळी साठी तयारी करू लागतात.

आम्ही सर्व गावातली मुले एकत्र येतो आणि दिवाळी साठी एक मोठा आकाश कंदील बनवतो आणि तो गावात लावतो आणि त्या वर काही सादेंश देतो. घरात ले सर्व जन मिळून घराची साफ-सफाई करतो. आमच्या घरी सुधा मी व माजे बाबा मिळून एक छोटा कंदील बनून घरा बाहेर लावतो.

माझी ताई घरा बाहेर सुंदर रांगोळी काढते, आई दिवाळी साठी स्वादिष्ट फराळ बनवते जसे कि चकली, चिवडा, लाडू, करांची आणि भरपूर काही मला चकल्या कूप आवडतात. सगळा फराळ आमच्या गावात एकमेकांना दिला जातो.

दिवाळी साठी बाबा मला नवीन कपडे आणून देतात आणि सगळ्यांची आवडती वस्तू म्हणजे दिवाळी चे फटके आणून देतात, मी आणि माजे सर्व मित्र खुप फटके फोडतो आणि कूप मज्या करतो. मी आणि माजे मित्र मिळून एक छोटा किल्ला सुधा तयार करतो मला हा किल्ला बनवायला खूप आनंद येतो.

ह्या सणाला सर्वी कडे दिवे लावले जातात सर्वी कडे प्रकाश असतो. दिवलीची दुसरी मजा म्हणजे भाऊ-बिज, भाऊबीजेला ताई मला ओवाळते आणि मी तिला एक भेटवस्तू देतो. तसेच लक्षुमी पूजन केले जाते ज्या मदे धना ची पूजा केली जाते.

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि दिवाळी मदे लावलेला दिवा आपल्यांन अंदर घालून प्रकाश आणून एक संदेश देतो. दिवाळीला शाळेला सुट्टी असते आणि खूप मजा करायला मिळते म्हणूनच दिवाळीचा हा सण मला खूप खूप आवडतो.

Answered by choudharybharti19042
0

Answer:

आपल्या देशात वेळोवेळी अनेक सण साजरे केले करतात. मला या सर्व सणांमध्ये सर्वात जास्त दिवाळीचा सण खूप चांगला वाटतो.

      दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येला साजरा केला जातो . त्या दिवशी आकाशात चंद्र उगवत नाही, काळाकुट्ट अंधार असतो .लोक आपल्या घरात दिवे लावतात . आणि काळ्या रात्रीचा प्रकाशात बदल होतो.

   दीपावलीचा हा पर्व धनतेरस पासून आरंभ होतो तर भाऊबीज पर्यंत पाच दिवस चालतो. लोक आपापल्या घरांना सजवतात . नवे कपडे खरेदी करतात. मित्रांना ,नातेवाईकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या जातात. मिठाई , दीपावलीचा फराळ पाठवला जातो . याप्रसंगी बाजारात रंगीबेरंगी लाईटींग लावली जातात. बाजाराची शोभा पाहायला मिळते. मुलांना खेळणे खरेदी करून देतात.

    मी दिवाळीच्या दिवसांत मोठमोठ्या रांगोळ्या काढते .आईला दिवाळीचा फराळ करण्यात मदत करते . दिवाळीच्या फराळात लाडू ,चिवडा ,करंजी ,अनारसे ,चकली असे बरेच काही बनवले जातात . मला दिवाळीची तयारी करायला खुप आनंद मिळतो.

      दिवाळीच्या पाच दिवसात पुजेची तयारी करण्यात आनंद मिळतो . दिवाळीच्या पाच दिवसात दिवे लावली जातात .सगळकडे दिव्यांच्या प्रकाशाचा झगमगाट असतो . प्रकाश अंधारावर विजय मिळवतो .

     म्हटले जाते की ,लंकेचा राजा  रावणाचा वध करून या दिवशी परमेश्वर श्रीराम अयोध्येला परत आले होते . म्हणून लोकांनी आपला आनंद दर्शविण्यासाठी अयोध्या नगरीला सजवले . दिवे लावून चारही दिशांना प्रकाशित केले.

   दिवाळीच्या दिवसापासून व्यापारींचो  नवीन वर्ष सुरू होते आणि रात्री लक्ष्मी गणेश पूजन करतात .  व्यापारी या दिवशी वही पूजन करतात. नवे वही खाते सुरू करतात .नवी वही  घेऊन त्यात हिशोब करण्यास  सुरूवात करतात .

    अंधारावर प्रकाशाचा विजय मिळविण्याचा पर्व आहे . वाईटचा चांगल्या गोष्टींवर विजय मिळवण्याचा पर्व आहे . म्हणून दीपावलीचा सण मला खूप आवडतो.

Similar questions