Hindi, asked by srushti262003, 10 months ago


'माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे!', या विधानातील आशयसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.

Answers

Answered by trupti94
201

Answer:

माणूसच माणसास जन्म देतो हे आपल्याला माहित असेलच . पण माणूस माणसास दरवेळेसच मदत करेल असे नाही पण ज्या वेळेस एखादा माणूस स्वच्छ मनाने दुसऱ्यास मदत करू इच्छितो व त्याने ती केलीही तेव्हा दुसऱ्या मध्ये माणुसकीची भावना निर्माण होते . तो माणूस त्याला देव मानू लागतो कारण तो माणूस त्याच्यासाठी देवासारखा धावून आला म्हणजेच माणसापेक्षा देव मोठा .पण देवातही जी जागी असते ती माणुसकी त्याच माणुसकीचा वापर हा मानव करत असतो.याच वाक्यावरून या ओळीचा अर्थ व्यक्त होतो.

plz या उत्तराला brainliest answer म्हणून क्लिक कर.

Answered by safamahat25
25

माणूस हा सामाजिक प्राणी आहे म्हणून तो गट करून राहतो आणि असा गट करताना बहुतेक वेळा माणसे जाती धर्माच्या साह्याने एकत्र होतात धर्मावरून एकमेकांना ओळखतात आपण वेगवेगळ्या धर्मांना वेगवेगळे गुण चिटकवून टाकले आहेत विशिष्ट धर्माचे लोक विशिष्ट स्वभाव गुणांनी युक्त असतात असे आपण ठरवून टाकले आहे माणसांचे हे वर्तन शतकानुशतके चालू आहे लेखकांना माणसांची ही वृत्ती माहित आहे .

या पाठातील मामू चा सहवासाने समाजाची ही चूक ठळकपणे लेखकांच्या लक्षात येते मामू हा धर्माने मुसलमान आहे वाचकाला हे केवळ दोन-तीन तपशिलांत आतूनच कळते त्याच्या पलीकडे वर्णनात कुठेही धर्माचा संबंध येत नाही मामू चे संपूर्ण . मामूमामू चे संपूर्ण वागणेच धर्मनिरपेक्ष आहे तो आणि इतर माणसे या सगळ्यांचे वागणे सारखेच आहे मामू भोवतालच्या समाजामध्ये पूर्णपणे मिसळून गेला आहे तो जातिधर्माच्या पलीकडे गेला आहे तो सर्वांकडे माणूस म्हणूनच पाहतो.

लेखकांना मामू चा दहा वर्षे सहवास लाभला आहे या दहा वर्षात मामू चा साधेपणा, सरळपणा, निष्ठ पणा, स्वभाव ,सेवाभावी, वृत्ती हे माणसांमध्ये चांगले गुण चे लेखकांच्या प्रत्ययाला आले आहेत म्हणजे मामू हा आर-पार सज्जन माणूस आहे.

शाळेत शिपाई म्हणून काम करताना त्याच्या मनात कधीही धर्माची भावना निर्माण झाली नाही कोणत्याही सच्च्या भारतीय याप्रमाणे त्याची ही देशभक्ती प्रामाणिक आहे शाळेतला मुलगा असो वा शिक्षक असो त्याच्याशीच मामू धर्म न पाहता आत्मीयतेने वाटतो म्हणूनच जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अनेक माणसांची त्याचे आपुलकीचे संबंध निर्माण झाले आहेत हे त्याच्या मुलाचा लग्नाचा वेळी सिद्ध होते माणसाने किती चांगले असावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे मामू होय या उदाहरणावरून .

...लेखकांना धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे ही जाणीव मनात ठसून जाते...❤️❤️❤️

......i hope this helps you guys......

Similar questions