India Languages, asked by sohailzafar, 6 months ago

मराठी आत्मकथन निबंध लहान शब्दांवर​

Answers

Answered by bishtvineeta34
0

Answer:

निबंध लिहीत असताना लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे:

धर्माचा अर्थ- मानवता म्हणजे काय ?- मानवाचे कर्तव्य- प्रेम बंधुभाव- मानवता या धर्माच्या आड- इतर धर्मांचे, जातीचे, पंथाचे अडचण येत नाहीत- आयुष्याचे फलित- संदेश- शेवट

" खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।"

परम पूज्य साने गुरुजींनी बालकांना दिलेला संदेश आहे. आज आपल्याला काय आवडते ? मानते धर्माविषयी च्या खोट्या कल्पना मनाशी बाळगून, एकमेकांचे प्राण घ्यायला तयार होतात. कारण माझा धर्म इतरांपेक्षा श्रेष्ठ असे ते मानत असतात.

खरे पाहता धर्म म्हणजे काय, हे त्यांना उमगले नसते. धर्म म्हणजे कर्तव्य ! कोणतेही कर्तव्य करताना आपल्या कृतीचा दुसऱ्याला त्रास होणार नाही ना, याचा माणसाने आधी विचार केला पाहिजे. माणूस आपल्या हक्काविषयी जागरूक असतो; पण त्याच वेळी त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडलेला असतो. दुसऱ्या शिवभक्तांना माणसाने हा विचार केला पाहिजे, की असे कोणी माझ्याशी वागले असेल, तर मला काय वाटले असते !

जगातील सर्व माणसे आपलीच आहे, असे आपल्याला वाटले पाहिजे. किंबहुना असे आपल्याला वाटत असतेच. म्हणून जगातील कोणत्याही देशांवर एखादी आपत्ती ओढवली, तर साऱ्या जगातून मदतीचा हात जातो. महाराष्ट्रात एखादी आपत्ती झाली, भूकंप केव्हा इतर कुठली घटना तर आपण वर्तमानपत्रांमध्ये याचा अनुभव घेतला असेलच. एका माणसाने स्वतःला श्रेष्ठ व इतरांना कनिष्ठ मानणे चुकीचे आहे. ' अस्पृश्यता' हा मानवजातीवर चा मोठा कलंक आहे. वाळवंटात चटके बसणाऱ्या अस्पृश्यांच्या बाळाला एकनाथांनी उचलून घेतले, तेव्हा त्यांचे सोहळे कोठेही आड आले नाही. जगातील सर्व माणसे माझी, मी त्यांचा ही वृत्ती 'मानवता' धर्माची शिकवण आहे

मित्रांनो मानवता हाच खरा धर्म या निबंधाविषयी आपल्याला काही मुद्दे किंवा काही सूचना निबंधामध्ये अधिक विस्तार करण्यासाठी तुमचा अभिप्राय कमेंट करून जरूर कळवा तसेच तुमच्या मित्रासोबत हा निबंध शेअर करून मानवतेची महती आणि जाणीव इतरांना सुद्धा करून द्या.

Explanation:

please please please comment on and like

Similar questions