India Languages, asked by Zema1664, 1 year ago

Marathi essay on kalachi garaj

Answers

Answered by jesikadhakade
4

Explanation:

sorry I cannot write Marathi essay

Answered by Hansika4871
8

*काळाची गरज*

विषय स्पष्ट न केल्याने मी ज्या गोष्टींची गरज आपल्याला लागते त्या बाबत निबंध लिहिणार आहे.

काळाची गरज म्हणेजच ज्या गोष्टींची गरज आपल्याला भासते अथवा ज्या गोष्टींची गरज आपल्याला पुढे लागणार असते. ह्या गोष्टी अत्यावश्यक सेवेमध्ये मोजल्या जातात. या गोष्टींशिवाय आपले नेहमीचे काम अपुरे राहते.

खाली काही काळाची गरज असलेल्या वस्तूं चे स्पष्टीकरण केले आहे. याला आपण निबंधाच्या स्वरुपात देखील लिहू शकतो.

१) मोबाईल: काळाची गरज.

एकविसाव्या शतकात मोबाईल काळाची गरज बनली आहे. फोन करने, मेसेजेस, व्हिडिओ काॅल, इंटरनेट बँकिंग ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण मोबाईलचा वापर करतो. हे छोटेसे यंत्र बरच काही करू शकते, जर आपण त्याचा नीट वापर केला तरच. नाही तर कठीण प्रसंग उद्भवतात.

फायदे: दुरावलेली नाती जवळ येतात, इंटरनेट बँकिंग, पैसे देवाण, घेवाण, मनोरंजन इत्यादी

तोटे: लहान मुले मोबाईलवर खूप वेळ गेम खेळत बसतात ज्या मुळे लहान वयातच त्यांना चष्मा लागतो, मोबाईलवर जास्त वेळ राहिल्यावर शारीरिक कामे सोडून माणूस एके ठिकाणी बसून राहतो.

२) संगणक काळाची गरज

विज्ञान युगात नवीन नवीन शोधांची वाढ होत आहे, त्यातलाच एक शोध म्हणजे संगणक. आज संगणक सर्वांचीच गरज झालेला आहे. उठता, बसता अगदी दिवसाचे चोवीस तास आपण त्याचा वापर करत असतो. संगणकामुळे आपल्याला चांगल्या गोष्टी मिळाल्या असल्या तरी काही परिणामांना सामोरं जावं लागतं आहे.

आताच्या काळात संगणक नसेल तर कामे रखडतील, एकमेकां पर्यंत संदेश वहन होऊ शकणार नाही, संकट ग्रस्तांना मदत मिळू शकणार नाही, दूरदेशी च्या बातम्या कळू शकणार नाही. ऑफिस ची कामे रखडतील म्हणून संगणक आताच्या काळाची गरज आहे.

Similar questions