English, asked by amolssawant83, 8 hours ago

marathi marathi. marathi marathi.​

Attachments:

Answers

Answered by reshmachavan286
15

एका जंगलात एक वाघ इतर प्राण्यांना खूपच त्रास द्यायचा. सगळे प्राणी त्याच्या त्रासाला खूप कंटाळले होते. हरिण, डुक्कर, ससा, कोल्हा यांचे कळप या वाघाला जरा जास्तीच घाबरलं होतं. काय करावं हे काहीच त्यांना सुचत नव्हतं. हा वाघ रोज एका कळपात शिरुन एकाची सर्वांसमक्ष शिकार करायचा. शेवटी कंटाळून सर्व प्राण्यांनी एक सभा आयोजित केली. सभेच्या अध्यक्ष स्थानी अर्थात कोल्होबा होते. कोल्ह्याने सभा मंडळात एक युक्ती सांगितली. ती युक्ती अशी की ज्या मार्गाने वाघोबा हल्ला करण्यासाठी येतात त्या मार्गावर एक खड्डा खणयचा. बऱ्याच जणांनी यावर विचार विनिमय केला. ससा सोडून सर्वांनी तो प्रस्ताव मान्य केला. सशाचं म्हणणं होतं की असं केलं तर वाघ जास्त संतापेल. आणखीन जास्त आक्रमण करेल. पण बहुमताने ठराव संमत झाला. सगळे कामाला लागले. खूप मेहनत करून मोठा खड्डा त्या सगळ्यांनी मिळून खोदला. या कामी डुक्कर खूप कामी आलं. त्या दिवशी त्या सर्वांनी जंगी मेजवानी ठेवली आणि तिथं पहारा ठेवत बसले. अर्थात त्या खड्ड्यावर गवत ठेवण्याचं काम हरणाने केलं. वाघोबा रमत-गमत शिकारीसाठी निघाला आणि त्याठिकाणी येऊन पोहोचला. अचानक वेग वाढवून झपकन खंड्ड्याच्या पलीकडे गेला. लपून बसलेले सर्वजण घाबरले मात्र चलाख कोल्होबा अलीकडे दबा धरून होता. त्यांनी वाघाचं लक्ष जाण्यासाठी आरोळी दिली. वाघोबा परत फिरले आणि कोल्ह्याच्या शिकारीसाठी परत फिरले आणि धाडकन खड्ड्यात पडले. सर्वांनी निःश्वास सोडला आणि कोल्ह्याची पाठ थोपटली.

Answered by shaikhshifa15094
0

Answer:

Explanation:

chapo aur chap

Similar questions