English, asked by iammehboob0796, 10 months ago

Me pakshi zalo tar essay in Marathi

Answers

Answered by neelotpal136
205
मी पक्षी झालो तर

एकदा आम्ही प्रवासाला निघालो होतो. आणि रस्त्यावरील वाहतुकीच्या ट्रैफिक मुळे आमची ट्रेन चुकली। त्या क्षणी सहजच मनात विचार आला, जर
मला पंख असते, मी पक्षी असतो तर!”

खरच न जर मी पक्षी असतो तर, जेव्हा कधी वाटलं तेव्हा, जिथे वाटलं तिथे आकाशात उंच भरारी घेतली असती व लगेच उडत गेलो असतो. देश विदेशी सैर करून सर्व स्थळे बघून घेतली असती. रस्त्यावरील गर्दीचा त्रास नाही,  वाहतुकीचा त्रास नाही अथवा वाहनाची किंवा कुणाच्या
परवानगीची आवश्यकता नाही की अपघाताची भीती नाही. रस्त्यावरील घाण, कचरा, दुर्गंधी, खड्डे हे सगळे याची परवा नाही.

सर्वात महत्त्वाच म्हणजे कुठलाही देखावा नाही की अवडंबर नाही. स्वतःच सामर्थ्य कुणालाही दाखविण्याची गरज भासणार नाही. जीवनातील स्पर्धेत जिंकण्याकरिता प्रयत्न कराव लागणार नाही.

बसची तासन तास वाट बघण्याची गरज पडणार नाही. आईला बाजारातून आवश्यक सामान त्वरित उडत जाऊन घेऊन येणार. शाळेत अगदी वेळेवर पोहचणार. जिथे फिरायला जावसं वाटेल तिथे जाणार. किती छान आहे ही कल्पना.

पण पुढल्याच क्षणी विचार आला कि मी एकटेच, काय मजा करणार.

माझे कुणीही मित्र राहणार नाही. जर मी पक्षी झालो तर मी एकटाच नव्हे तर सर्वच पक्षी व्हावे.

HOPE IT HELPS YOU

PLEASE MARK ME AS BRAINLIST!!!!!!!

THANK YOU!
Answered by yash1403
71

hey mate.

look for the following 2 essays:

1.मी पक्षी झालो तर...

.

मी एकदा असाच विचार करत बसलो होतोे आणि तेवढ्यात मला पक्ष्यांची किलबिलाट ऐकायला येऊ लागली. तेव्हा माझ्या मनात देखील विचार आला कि जर मी सुद्धा पक्षी झालो असतो तर... किती मज्जा आली असती ना! मला देखील इतर पक्ष्यांसारखं उडता आलं असतं.

मला जर ही संधी मिळाली असती तर खूप बरं झालं असतं. मला आकाशात खूप लांब पर्यंत ऊडता आलं असतं. झाडांवर घरटं बनवता आलं असतं. मुळात एका गोष्टीचा मला खूप आनंद झाला असता ते म्हणजे मला शाळेत जायला लागलंच नसतं, आणि जर शाळा नसती तर अभ्यास देखील नसता करायला लागला! सकाळी लवकर ऊठायची पण गरज नसती लागली. मला अस वाटायला लागलं कि मी जसा स्वप्नातच हरवलो होतो! अशा एक एक कल्पना माझ्या मनात येऊ लागल्या.

जर अचानक उडता उडता जर आपटलो आणि मला लागलं तर! मला कोण वाचवणार? माझ्यासोबत मैत्री कोण करणार ? नंतर मला अस वाटलं कि नको नको मानव जीवन हेच खूप चांगलं आहे.

.

or

.

2. मी पक्षी झालो तर

.

एकदा आम्ही प्रवासाला निघालो होतो. आणि रस्त्यावरील वाहतुकीच्या ट्रैफिक मुळे आमची ट्रेन चुकली। त्या क्षणी सहजच मनात विचार आला, जर मला पंख असते, मी पक्षी असतो तर!”

खरंच न जर मी पक्षी असतो तर, जेव्हा कधी वाटलं तेव्हा, जिथे वाटलं तिथे आकाशात उंच भरारी घेतली असती व लगेच उडत गेलो असतो. देश विदेशी सैर करून सर्व स्थळे बघून घेतली असती. रस्त्यावरील गर्दीचा त्रास नाही,  वाहतुकीचा त्रास नाही अथवा वाहनाची किंवा कुणाच्या परवानगीची आवश्यकता नाही की अपघाताची भीती नाही. रस्त्यावरील घाण, कचरा, दुर्गंधी, खड्डे हे सगळयांची परवा नाही.

सर्वात महत्त्वाच म्हणजे कुठलाही देखावा नाही की अवडंबर नाही. स्वतःच सामर्थ्य कुणालाही दाखविण्याची गरज भासणार नाही. जीवनातील स्पर्धेत जिंकण्याकरिता प्रयत्न करावं लागणार नाही.

बसची तासन् तास वाट बघण्याची गरज पडणार नाही. आईला बाजारातून आवश्यक सामान त्वरित उडत जाऊन घेऊन येणार. शाळेत अगदी वेळेवर पोहचणार. जिथे फिरायला जावसं वाटेल तिथे जाणार. किती छान आहे ही कल्पना.

पण पुढल्याच क्षणी विचार आला कि मी एकटेच, काय मजा करणार. माझे कुणीही मित्र राहणार नाही. जर मी पक्षी झालो तर मी एकटाच नव्हे तर सर्वच पक्षी व्हावे.

.

Hope it helps.

.

Please mark as brainliest.

.

Thanks :)

Similar questions