Hindi, asked by brainlyuser1221, 5 months ago

*निसर्गाचे महत्त्व*
Write an essay in Marathi
Please answer fast it is very much needed
Don't give useless answers
Otherwise you would be warned
I will mark you brainliest​

Answers

Answered by muddassiraliansari
4

Answer:

निसर्ग ही मानवाला देवाकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. निसर्ग म्हणजे – पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश या पाच तत्त्वांनी बनलेली सृष्टी होय. मानवाचा जन्म या पाच तत्वांमधून झाला आहे.

याच पाच तत्त्वात माणूस विलीन झाला आहे. आपण या निसर्गात जन्मतो, वाढतो आणि विलीन सुद्धा होतो. त्यामुळे आपण या निसर्गाचे जातं करणे आणि संरक्षण करणे गरजेचे आहे.

या निसर्गाने आपल्याला अनेक प्रकारची फुले, फळे, प्राणी, पक्षी, निळे आकाश, जमीन, नद्या, समुद्र इत्यादी सर्व काही दिले. मानवाच्या जीवनाचा विकास होण्यासाठी देवाने या सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत.

या निसर्गाने मानवाला खूप काही दिले. परंतु मानव या निसर्गाचा नाश करत आहे. मानव आपल्या सुख – सुविधा आणि स्वार्थ पुरा करण्यासाठी झाडांची दिवसेंदिवस तोड करत आहे.

त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग,अनेक प्रदूषणाच्या समस्या, ग्लोबल वॉर्मिंग यांसारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणून आपण सर्वानी जितके शक्य होईल तितके वातावरण स्वच्छ ठेवले पाहिजे.

IF YOU LIKE MY ANSWER THEN YOU CAN MARK MY ANSWER AS THE BRAINLIST ANSWER

Similar questions