India Languages, asked by pawarprajakta904, 4 months ago

नदीचे पाणी कशा मुले प्रदूषित होते?​

Answers

Answered by sanjaykumarhjp75
4

Explanation:

हवा – पाणी – अन्न या माणसाच्या तीन गरजांपैकी पाणी हि दोन नंबरची गरज आहे.  आपल्याला पाणी स्वच्छ आणि शुद्ध मिळणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्वाचे आहे.  प्रदूषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात.  पाणी प्रदूषित होण्याची अनेक करणे आहेत आणि याला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत.

अनेक मार्गाने पाणी प्रदूषित होत आहे.  वेगवेगळ्या कारखान्यातले दुषित पाणी ओढ्यावाटे नदीपत्रात सोडले जाते.  गावातले – शहरातले सांडपाणी – घन पाणी नदीपत्रात सोडले जाते.  या दोन्ही कारणांनी मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रदूषण वाढते.  पावसाच्या वाहत्या पाण्याबरोबर माती – गाळ – कचरा – घाण मिसळते आणि पाणी दुषित होते.  याशिवाय घराच्या छोट्या कारणाने पाणी प्रदूषित होतच असते.  नदीनाल्यात जनावरे धुणे, औषध फवारणीचे पंप धुणे, वेगवेगळी रसायन पाण्यात सोडणं, कारखान्यांची मळी स्पेंन्ट वॉश डायरेक्ट पाण्यात सोडणं.  केमिकलनं माखलेले कपडे – वस्तू पाण्यांत टाकणे.  अशा कितीतरी गोष्टींमुळे पाणी गढूळ होत, दुषित होत.  रासायनिक खतांचा निचरा होऊन पाणी दुषित होते.  पाण्यात मिसळल्या गेलेल्या रसायनात त्यामुळे बदल होत जातात आणि त्यातून जी नवीनच हानिकारक रसायने तयार होतात त्यामुळे पाणी प्रदूषित होते.

Similar questions