Hindi, asked by punamnehete134, 6 months ago

पाण्याचा योग्य वापर कसा करावा यावर उपाय सुचवा.​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

पाणी दुर्मिळ वस्तू बनत चालली आहे याची आता आपल्या सर्वांना जाणीव व्हायला लागली आहे. जितके काटकसरीने आपण ते वापरू तितके ते जास्त दिवस पुरणार आहे. पाणी ही एक जीवनावश्यक बाब आहे. त्यामुळे ते वापरावे लागणारच आहे पण ते वापरत असतांना जरा थोडे जपून अथवा काटकसरीने वापरले तर त्यात निव्वळ आपलेच नव्हे तर समाजाचेही भले आहे. मग चला तर आपण शोधू या पाण्याच्या बचतीचे मार्ग :

1. नळ सुरू ठेवून तोंड धुतले तर 20 लिटर पाणी आपण वाया घालतो. मग मध्ये पाणी घेवून तोंड धुतले तर फक्त 5 लिटर पाणी लागते.

2. बेसीन मधला नळ चालू ठेवून दाढी केली तर 25 लिटर पाणी लागते पण मग मध्ये पाणी घेवून दाढी केली तर दाढी 5 लिटरमध्येच आटोपते.

3. बादली मध्ये पाणी घेऊन आंघोळ केला तर फक्त 20 लिटर पाणी लागते पण शॉवर खाली उभे राहून आंघोळ केली तर 250 लिटर पाणी आपण वापरतो.

4. टबमध्ये बसून आंघोळ करणे हा पाण्याच्या अतिरेकी वापर ठरतो. यासाठी 600 लिटर पाणी लागते.

5. बादली मध्ये पाणी घेवून भांडी घासली तर 40 लिटर पाणी लागते पण तीच भांडी वाहत्या नळाखाली धुतली तर 200 लिटर पाणी लागेल.

6. बादलीमध्ये पाणी घेऊन कपडे धुतले तर 40 लिटरमध्ये काम भागते पण वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतले तर एका वापरात 200 लिटर पाणी लागते.

7. कालचे भरलेले व उरलेले पाणी शिळे पाणी म्हणून फेकून देवू नका. पाणी एका दिवसात शिळे होत नसते.

8. आंधोळ केलेले पाणी जमा करा. त्याच पाण्याचा सडा टाका, त्याच पाण्यातून गाड्या धुवा, तेच पाणी संडास सफाईसाठी वापरा, तेच पाणी बगीच्यातील झाडांना टाका, यालाच पाण्याचा पुनर्वापर म्हणतात.

9. घरी आलेल्या पाहुण्याला त्याचे स्वागत म्हणून पाणी देण्याची परंपरागत पध्दती बंद करा. तो निव्वळ पाणी उष्टावून ग्लास ठेवून देतो. अर्थातच त्याने मागितल्यास त्याला पाणी जरूर द्या.

10. घरातील गळक्या तोट्या विनाविलंब दुरूस्त करून घ्या. जरी ते थेंबथेंब गळत असले तरी दिवसभरातील गळती शेकडो लिटर असू शकते.

11. घरातील फरशा, जिने, गच्च्या धुण्याच्या फंदात पडू नका. ओल्या पोछाने जरी पुसले तर त्या स्वच्छ राहतात.

12. शहरातील पाण्याच्या पायपात गळती दिसल्यास योग्य अधिकाऱ्यांकडे किंवा कार्यालयात तक्रार नोंदविणे आपले कर्तव्य समजा.

13. पाण्याचा कोणी चुकीचा वापर करीत असेल तर त्याला योग्य प्रकारे समजावून सांगून त्याला त्यापासून परावृत्त करा.

14. विहिरी, तलाव, नद्या तसेच पाण्याचे इतर साठे यांना शुध्द ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या.

15. गच्चीवरील पाण्याच्या टाक्या नळ बंद न केल्यामुळे विनाकारण वाहतच राहतात. त्या वाहणार नाहीत याची काळजी घ्या.

16. घरातील बगीचाला अथवा शेताला भर उन्हात पाणी देणे बंद करा. त्यामुळे पिकाला किंवा झाडांना फायदा तर होतच नाही उलट बाष्पीभवन वाढून पाणी वाया जाते.

17. बगीचातील झाडांना पाणी दिल्यानंतर आळ्यात पालापाचोळा, गवत इत्यादी टाकून ठेवा त्यामुळे ओल जास्त वेळ टिकून राहील व बाष्पीभवनाचा दर कमी होईल.

18. झाडांना पाणी देतांना ते झाडांना द्या, जमिनीला देवू नका. झाडाला जेवढे पाणी हवे तेवढेच दिल्याने त्याची वाढ चांगली होते व पाणीही वाया जात नाही.

19. ज्या पिकांना जास्त पाणी लागते ते लावण्याच्या आधी विचार करा व मगच पिकांची निवड करा. असे केल्यास पाण्याचा अपव्यय टाळता येईल.

20. जमिनीतून पाण्याचा उपसा कमीत कमी करा. जमिनीतील पाण्याचे साठे राखीव आहेत असे समजा व गरज असल्यासच उपसा करा.

21. सिंचनाच्या पारंपारिक पध्दती वापरण्याचे एैवजी आधुनिक सिंचन पध्दतीचा वापर करा. ठिबक सिंचन व तुषार सिंचन पध्दतींचा अवलंब केल्यास भरपूर पाणी वाचू शकते.

22. आधुनिक शेती पध्दतींचा अवलंब करून तेवढ्याच पाण्यात अधिक उत्पादन मिळवा. तेवढ्याच पाण्यात जास्त उत्पादन मिळाल्यामुळे प्रती क्विंटल उत्पादनास निश्चितच कमी पाणी लागेल.

23. मोठ्या शहरात वितरण पध्दती सदोष असेल तर 30 ते 40 प्रतिशत पाण्याची गळती होते. ही गळती शोधून काढून थांबविल्यास पाण्याची भरपूर बचत होवू शकेल.

24. बऱ्याच गावात सार्वजनिक नळांना तोट्याच बसवित नाहीत. त्यामुळे अशा नळांमधून अव्याहतपणे पाणी वाहत राहते. शुध्द केलेले पाणी अशा पध्दतीने वाया जाऊ देणे योग्य नव्हे.

25. सार्वजनिक ठिकाणी संडास, वॉश बेसिनमध्ये आपोआप स्प्रिंगद्वारे बंद होणाऱ्या तोट्या वापरल्या जाव्यात. त्यामुळे चुकून वा निष्काळजीपणे नळ चालू राहणार नाहीत व पाणी वापरावर आपोआप बंधन येईल.

26. फ्लशच्या संडासात प्रत्येक वापरापाठीमागे 15 लिटर पाणी लागते. मग तो वापर मूत्र विसर्जनासाठी असो अथवा मलविसर्जनासाठी, तेवढे पाणी लागतेच. त्यामुळे फ्लशची टाकी न वापरता बादलीचा वापर केला तर वापरात बरीच बचत होवू शकते.

27. ज्या ठिकाणी (मग तो वापर शाळा कॉजेल मधला असो, कारखान्यातील असो अथवा हॉटेलमधील असो) भरपूर लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते त्याठिकाणी पाण्याच्या ग्लासचा आकार छोटा ठेवला तर बरेच पाणी वाचू शकेल कारण अशा ठिकाणी अर्धाच ग्लास पाणी वापरून बाकीचे पाणी सहसा फेकून दिले जाते.

28. विजेप्रमाणे नागरिकांना पाणीसुध्दा मीटरने देण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे पाण्याच्या वापरावर बरेच बंधन ओलेले दिसेल.

Similar questions