Social Sciences, asked by Ompanchal, 1 year ago

प्रिय बापू (महात्मा गांधी) मला प्रेरणा देतात. निबंध

Answers

Answered by Shaizakincsem
5
You are a great leader and you are someone who lived a very selfless life which was for not for himself but for other people.  You were always determined in whatever you do and is someone who has a very strong will power. 

Being true to myself and everyone around is what I learned from you. Belonging to such a simple family and having such a simple life you still gave preference to the studies and acquired the best education possible.

You are my role model when it comes to simple living and high thinking, even with the simple lifestyle you had so much exposure in life. 

I also came to know that you were a good writer as well which inspires me to be versatile and participate in as many good causes as I can. 

Above all the biggest amazing trait of yours which I never forget to mention is that your brought change in the world without any violent activities which is just remarkable. Even after you left this world you inspire you many people. Today in a world of so many advancements I still wish and hope to become like you.

Shaizakincsem: I am sorry I forgot to add this in Hindi. I can inbox you the link for Hindi if you want. Let me know!
Answered by ItsShree44
0

Answer:

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे माझे आवडते पुढारी आहेत. सत्याग्रह व असहकार या जगावेगळ्या अहिंसक शस्त्रांनी त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. बापूजी 'महात्मा' कसे झाले, याचा शोध घेतला की, त्यांच्या चरित्रातील दिव्यत्व प्रत्ययास येते. आपली जीवनकहाणी सांगताना बापूजी तिचा उल्लेख 'सत्याचे प्रयोग' म्हणून करतात. त्यांनी आपल्या या चरित्रात जीवनातील सर्व चुकांची त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली आहे. गांधीजींनी लोकांना सत्याचे नुसते पाठ दिले नाहीत, तर स्वत:च्या जीवनात सत्याचे प्रयोग प्रत्यक्ष करून दाखवले. महात्माजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. बापूजींनी आयुष्यभर सत्य, अहिंसा या व्रतांचे कठोरपणे पालन केले; बापूजींजवळ असामान्य धाडस होते. आपल्या देशातील लोकांची विपन्नावस्था पाहून बापूजी केवळ पंचा नेसूनच सर्वत्र वावरू लागले.

सशस्त्र सरकारला त्यांनी आव्हान दिले ते नि:शस्त्र हातांनी. 'सत्याग्रह' या नवीन अस्त्राचा उपयोग त्यांनी प्रथम आफ्रिकेत आणि नंतर भारतात केला. १९२० ची बापूजींची असहकार चळवळ, १९३० ची 'दांडी यात्रा' व १९४२ चा 'चले जाव' लढा - हे साऱ्या विश्वातील स्वातंत्र्यआंदोलनांमधील सोनेरी क्षण होते. बापूजींच्या मोठेपणाचे रहस्य त्यांच्या निष्कलंक चारित्र्यात होते. बापूजींजवळ विलक्षण 'संयम' होता. आजच्या विद्यार्थ्यांत कोणत्याही त-हेचा 'मनोनिग्रह' आढळत नाही.

मनोनिग्रहाचे महत्त्व त्यांना बापूजींच्या जीवनचरित्रातून कळून येईल. एकदा डॉक्टरांनी कस्तुरबांना आजारपणात मीठ सोडायला सांगितले होते; परंतु त्या तयार नव्हत्या. तेव्हा बापूजींनी त्यांचे मनोबल तयार करण्यासाठी स्वत:चnमीठ सोडले. अखेरपर्यंत त्यांचे भोजन म्हणजे खजूर व शेळीचे दूध हे साधे पदार्थ होते. सत्ता, संपत्ती यांच्या जीवघेण्या स्पर्धेत बापूजी केव्हाच अडकले नाहीत. आफ्रिका सोडताना त्यांना मिळालेल्या सर्व भेटी त्यांनी देशकार्यासाठी अर्पण केल्या. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेच्या कोणत्याही पदाची हाव न धरता, ते निर्वासितांच्या सेवेला धावून गेले. सामान्याकडून असामान्यत्वाकडे यशस्वी वाटचाल कशी करता येते, याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे राष्ट्रपिता बापूजी ! प्रख्यात तत्त्वज्ञ आईनस्टाईनने महात्माजींविषयी असे म्हटले आहे की, "आणख काही वर्षांनंतर असा एक मनुष्य झाला होता, यावर कोणी विश्वास ठेवणार नाही.

Similar questions