English, asked by shrisaviy, 5 months ago

पोट खाटेवर, मृत्यूच्याचा द्वारा
कुणा गरीबाचा, तळमळे बिचारा.
पुढील ओळीतील मात्र मोजून वृत्त लिहा​

Answers

Answered by Itz2minback
0

Answer:

इंद्रवज्रा म्हणिजे कवीने । ता ता ज गा गा गण येत जीने ॥

त्या अक्षरे येत पदात अक्रा । ‘तारी हरी जो धरि शंखचक्रा’ ॥

भगवद्‌ गीता दोनच वृतांत लिहिली गेलेली आहे. बहुतांश श्लोक हे अनुष्टुप्‌ छंदात लिहिले गेले आहेत. तर काही श्लोक इंद्रवज्रा वृतांत. इंद्रवज्राचे उदाहरणः

वासांसि जीर्णानि यथा विहाय । नवानि गृण्हाति नरोऽपराणि ॥

तथा शरीराणि विहाय जीर्णांनि । अन्यानि संयाति नवानि देही ॥ गीता-२-२२

सांडूनिया जर्जर जीर्ण वस्त्रे । मनुष्य घेतो दुसरी नवीन ॥

तशीचि टाकूनि जुनी शरीरे । आत्माहि घेतो दुसरी निराळी ॥ गीताई-२-२२

इतर उदाहरणेः

१. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा । बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः स्वभावः ।

करोमि यद्यद्‌ सकलं परस्मै । नारायणायच समर्पयामि ॥

२. चोरा बरा तू मज गावलासी । का सांग येथे अजि पावलासी ॥

ना बोलसी तै चल ठाणियासी । वाचाळ होशील तु पोलिसासी ॥

३. कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथा मुकुटी झळाळी ॥

कारूण्यसिंधू भवदुःख हारी । तुजविण शंभो मज कोण तारी ॥

आदिशंकराचार्यकृत द्वादशज्योतिर्लिंगस्तोत्रही इंद्रवज्रा वृत्तातच रचलेले आहे.

उदाहरणार्थः

कावेरिकानर्मदयोः पवित्रे समागमे सज्जनतारणाय ।

सदैवमान्धातृपुरे वसन्तमोङ्कारमीशं शिवमेकमीडे ॥ ४ ॥

द्वादशज्योतिर्लिंगाणि – श्रीमत्‌ आदि शंकराचार्य

Similar questions