India Languages, asked by anshikasingh9992, 1 month ago

परीक्षा नसती तर निबंध​

Answers

Answered by dszanjal
4

Explanation:

Home कल्पनात्मक परीक्षा नसती तर मराठी निबंध | pariksha nastya tar essay in marathi

परीक्षा नसती तर मराठी निबंध | pariksha nastya tar essay in marathi

By ADMIN

शनिवार, २ जानेवारी, २०२१

परीक्षा नसती तर मराठी निबंध | pariksha nastya tar essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण परीक्षा नसतील तर मराठी निबंध बघणार आहोत. सोसायटीतील 'ऑर्केस्ट्रा'च्या कार्यक्रमाला संजूला जायचे होते, पण आई कडाडली, 'वेड्या, चार दिवसांवर परीक्षा आली अन् तू काय वेळ घालवणार ? काही जायचं नाही.' झाले! संजूने हातपाय आपटले अन् म्हटले या परीक्षाच नसत्या तर बरं झालं असतं.'

खरेच! परीक्षा नसत्या तर मुलांना सतत अभ्यासात बुडून जावे लागले नसते. आज काय आठवड्याची परीक्षा, मग मासिक परीक्षा, मग चाचणी, मग सहामाही, नंतर नऊमाही व शेवटी वार्षिक. अशा सतत परीक्षा चालू असतात. अन् मुलांना सतत मान मोडून अभ्यासात गर्क राहावे लागते. कारण परीक्षेत कमी गुण मिळाले तरी सरासरी गुण कमी होणार. अन् हल्ली तर एकाएका मार्काने नंबर मागे जात असतो. या अशा अतिशय स्पर्धेचा, मुलांच्या मनावर भयंकर ताण येतो. शिवाय मुले मग परीक्षार्थीच बनतात.

परीक्षेत कोणते प्रश्न येतील, परीक्षेसाठी काय विचारतील तेवढेच शिकायचे अशी त्यांची वृत्ती बनते आणि विषय खरोखर समजून घेणे, खोलात जाऊन अभ्यास करणे हे घडतच नाही. तसेच फक्त परीक्षेला महत्त्व असल्याने मुले नुसते पाठ करून येतात व परीक्षेत लिहितात, म्हणजे तो विषय त्यांना नीट कळला व मग ती मुले तसे लिहिणार असे होत नाही. जाऊ दे झाले!

परीक्षा म्हटले की मुलांच्या पोटात भीतीचा गोळा येतो. रात्री जागा! पहाटे उठा! एवढे करूनही काही वेळा शेवटी डोक्यात कोंबलेल्या साऱ्या अभ्यासातील परीक्षेच्या वेळी काहीच आठवत नाही. आजकाल १० वी, १२ वी च्या परीक्षांना इतके महत्त्व प्राप्त झाले आहे की विद्यार्थी बिचारे वर्षभर मान मोडून, दिवसरात्र मेहनत घेऊन अभ्यास करीत राहतात. त्या वर्षात मुलाला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करता येत नाही. सतत अभ्यास! अभ्यास! अभ्यास! बरे, एवढे करूनही अपेक्षित मार्कस् मिळतीलच असे नाही.

परीक्षकांच्या मर्जीवर तर मार्कस् अवलंबून असतात , शिवाय कुठे संगणकाच्या चुका होतात अन् मग मार्कस कमी मिळाले म्हणून विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होते. त्याला हव्या त्या अभ्यासाच्या शाखेत प्रवेश मिळत नाही, मग काही मुले निराश होतात, आपला आत्मविश्वास गमावून बसतात अन् मग त्यांच्या आयुष्याचे नुकसान होते. यातूनच कॉपी करणे, पेपर मिळवणे, परीक्षकांशी दोस्ती करणे अशा गैरमार्गाचा अवलंब चालू होतो. बघा! एवढी सगळी अनिष्टांची मालिका या परीक्षांमुळे होते. त्यापेक्षा परीक्षाच नसतील तर...!

Similar questions