India Languages, asked by vishnupatil2555, 4 months ago

पत्रलेखन .खालील निवेदन वाचा व त्याखालील क्रुती सोडवा​

Answers

Answered by Anonymous
4

Answer:

पत्रलेखन: प्रत्यक्षात बोलून जे काही एकमेकांना कळविता येत नाही, ते लिखित स्वरूपात कळविण्याचा लेखनप्रकार म्हणजे पत्रलेखन, असे स्थूलपणे म्हणता येईल. पत्राचा लेखक, पत्र ज्याला उद्देशून लिहिले जाते, तो त्याचा वाचक व पत्राचा मजकूर असे पत्रलेखनाचे तीन प्रमुख घटक मानता येतील. यांशिवाय पत्र ज्या रीतीने त्याच्या अभिप्रेत वाचकांपर्यंत पोहोचविले जाते (उदा., आधुनिक काळात जी प्रगत शासकीय टपालयंत्रणा आढळते, ती यंत्रणा), ती रीतीही पत्रलेखनात एक महत्त्वाची घटक ठरते. आलेली पत्रे व पाठविलेल्या पत्रांच्या स्थळप्रती जपून ठेवण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती संभवतात. पत्रलेखन ज्यावर केले जाते, ती पाने कशी असावीत, यांसंबंधीही विविध संकेत रूढ झालेले आढळतात. आधुनिक पत्रलेखनात या सर्वच गोष्टींचा विचार करण्यात येतो.

Similar questions
Math, 2 months ago
Math, 9 months ago