History, asked by shaikhrehan82734, 4 months ago

१)
पध्दतीत सार्वजनिक पदे वंशपरंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तींकडे असतात.​

Answers

Answered by chandana558
0

Answer:

ok

Explanation:

गुप्तकाल : तिसऱ्या शतकाच्या अखेरीस उत्तर हिंदुस्थानात, प्राचीन मगध देशात एक वंश उदयास आला. या वंशातील गुप्त नावाच्या पहिल्या राजावरून त्यास गुप्त वंश हे नाव मिळाले. या वंशातील राजांनी सु. ३०० ते ५५० पर्यंत भारतावर, विशेषतः उत्तर भारतावर, राज्य केले. या कारकीर्दीस गुप्तकाळ ही सर्वसाधारण संज्ञा देतात. या काळात गुप्तांच्या अंमलाखाली भारताचा सर्व उत्तर प्रदेश होता आणि त्यांचे मांडलिकत्व उत्तर हिंदुस्थानातील बहुतेक लहानमोठ्या राजांनी, तसेच पूर्वेकडील काही परकीय देशांनी मान्य केले होते. दक्षिणेतील बहुतेक राज्ये त्यांच्या वर्चस्वाखाली होती. यामुळे या काळात अखिल हिंदुस्थानवर गुप्तांचा अंमल होता, असे म्हणावयास हरकत नाही. या काळात राजकीय स्थैर्यामुळे कला, वाङ्‌‌मय वगैरे सर्व बाबतींत सर्वांगीण प्रगती झाली.

गुप्तकाळासंबंधीची माहिती मुख्यत्वे तत्कालीन वाङ्‌मय, कोरीव लेख, नाणी, पुरातत्त्वीय अवशेष आणि परकीय प्रवाशांचे वृत्तांत यांमधून उपलब्ध होते. या ऐतिहासिक साधनांव्यतिरिक्त अवशिष्ट मंदिरे व भित्तिचित्रे यांमुळेही तत्कालीन धार्मिक स्थिती व समाजजीवन यांची कल्पना येते.

ऐतिहासिक साधने : वाङ्‌मय : समुद्रगुप्ताचे म्हणून अलीकडे प्रसिद्ध झालेले कृष्णचरितनामक खंडित काव्य, विशाखदत्ताचे देवीचंद्रगुप्त हे संस्कृत नाटक आणि कालिदासाचे कुन्तलेश्वरदौत्य यांतून काही माहिती मिळते. तथापि कृष्णचरित हे बनावट असल्याचे आता सिद्ध झाले असून उर्वरित ग्रंथ सध्या उपलब्ध नाहीत. इतर ग्रंथांत आलेल्या त्यांतील उताऱ्यांवरून त्यांची हकीकत ज्ञात होते.

कोरीव लेख : उपरिनिर्दिष्ट साधनांत कोरीव लेखांचे महत्त्व विशेष आहे. अनेक गुप्त राजांच्या प्रशस्ती, त्यांनी व त्यांच्या अधिकाऱ्यांनी ब्राह्मणांना, देवांना व बौद्ध संघांना दिलेल्या दानांचे लेख, त्यांच्या आज्ञांना केलेल्या मृण्मय मुद्रा, खासगी व्यक्तींनी बांधलेल्या इमारती, मूर्ती, स्तूप इत्यादिकांवर अनेक कोरीव लेख आढळतात. त्यांवरून तत्कालीन परिस्थितीविषयी माहिती मिळते. इतर साधनांपेक्षा ही माहिती जास्त विश्वसनीय आहे.

नाणी : बहुतेक गुप्त राजांनी विविध प्रकारची सुंदर सोन्याची नाणी पाडली होती. त्यांवरून त्यांची सौंदर्यप्रीती, कलासक्ती, दैवते, संस्कृत भाषेवरील प्रेम इत्यादिकांची माहिती होते. काही नाण्यांवरून तत्कालीन घटनांचा (उदा., समुद्रगुप्ताच्या अश्वमेधाचा), तसेच आर्थिक परिस्थितीचा बोध होतो. शिवाय त्यांचे संचय सापडलेल्या ठिकाणांवरून ती पाडणाऱ्या राजांच्या राज्यविस्ताराची कल्पना येते

Answered by rakhsairaj
0

I don't know

Explanation:

zbbzbzbzbzbzbb

Similar questions