Science, asked by yashravindrajagtap06, 29 days ago

साप चावल्यावर काळजी घ्यायची​

Answers

Answered by jadhavathav03
0

Answer:

सर्पदंशावर अनेक प्रकारचे परंपरागत उपचार केले जातात. मृत्यूशी गाठ असल्याने मांत्रिकांचाही आधार घेतला जातो. एकूण सर्पदंशाच्या घटनांपैकी काहीजण दगावतात तर ब-याच जणांना काहीही होत नाही. यावरून अमुक एक उपचार चांगला किंवा निरुपयोगी असे ठरवणे अवघड आहे. मुळात सर्पदंशाच्या 80 टक्के घटना बिनविषारी दंशाच्या असल्याने उपचार न केला तरी 80 टक्के घटनांच्या बाबतीत 'यश' असते. मात्र वीस टक्के अपयशी घटना विसरल्या जातात किंवा त्यांच्या बाबतीत काहीतरी दैवी कारण किंवा पाप असेल असे समजून सोडून दिले जाते.

देवळात नेण्याचा खरा एकमेव उपयोग म्हणजे धीर देणे. कारण काही जण तरी भीतीनेच दगावतात. पण यात देवळात वेळ गमावण्याचा धोका आहेच. आधुनिक वैद्यकीय सोयी जेवढया उपलब्ध होतील तेवढया प्रमाणात ही अंधश्रध्दा कमी होईल. मंत्राने सर्पविष उतरवणे या अशक्य कोटीतल्या गोष्टी आहेत. अशा उपायांचे निरुपयोगित्व सिध्द करणे फार अवघड नाही. साप खेळवणा-या मांत्रिकांचेच मृत्यू सर्पदंशाने घडल्याच्या घटना आहेत.

Similar questions