Hindi, asked by dashingda1025, 10 months ago

समाज सुधारक बाबा आमटे मराठी निबंध। Baba Amte Essay in Marathi

Answers

Answered by Anonymous
11

Answer:

Explanation:

Shaizakincsem Samaritan

मुरलीधर देवीदास आमटे (26 डिसेंबर, 1 9 14 - 9 फेब्रुवारी 2008) हे बाबा आमटे (1 9 फेब्रुवारी 2008) म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय सामाजिक कार्यकर्ते आणि विशेषतः कुष्ठरोगातील गरीब जनतेच्या पुनर्वसन आणि सशक्तीकरणासाठी कार्य करणारे कार्यकर्ते होते.

1 9 50 मध्ये त्यांनी साध्वी आमटे आणि त्यांच्या पत्नी साधना आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी एक संस्था स्थापन केली होती. 1 9 4 9 साली हे पायरी एक अर्गो सेंटर म्हणून सुरू करण्यात आले.

 पद्म विभूषण, गांधी शांती पुरस्कार, रमण मॅगसेसे पुरस्कार, टेंपलटन पुरस्कार आणि जमनालाल बजाज पुरस्कार यासह अनेक पुरस्कार आणि बक्षिसे त्यांना देण्यात आले आहेत.

26 डिसेंबर 1 9 14 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात श्री. देवीदास आमटे आणि श्रीमती लक्ष्मीबाई आमटे यांचे जन्म झाले. ते एक श्रीमंत कुटुंब होते. त्यांचे वडील ब्रिटिश सरकारचे अधिकारी होते आणि जिल्हा प्रशासनासाठी आणि महसूल संकलनासाठी जबाबदार होते. मुरलीधरने आपल्या बालपणामध्ये त्यांचे उपनाम बाबा विकत घेतले होते

Answered by AfreenMohammedi
9

Hey. Buddy...

Answer:

मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६, इ.स. १९१४ रोजी झाला. वरोड्यापासून पाच-एक मैलांवरील गोरजे गावाची जमीनदारी आमटे घराण्याकडे होती. घरच्या सुबत्तेमुळे त्यांचे बालपण सुखात गेले. त्यांना रेसर कार चालवण्याची व वृत्तपत्रांतून चित्रपट परीक्षणे लिहिण्याची आवड होती. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूरमध्ये झाले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल्‌एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर बनावे असे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले. यानंतर त्यांनी काही काळ वकिलीही केली. इ.स. १९४९-५० या कालावधीत त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्ठरोगनिदानावरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला.

गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना [ संदर्भ हवा ] गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली व आपली प्रतिक्रिया नोंदवली. पंजाब दहशतवादाने वेढलेला असताना तेथील नागरिकांना इतर राज्यांतील भारतीय त्यांच्याबरोबर असल्याचा आत्मविश्वास देण्यासाठी बाबांनी पंजाबला भेट देण्याचे धाडस केले होते. त्यावेळी त्यांनी अनेक नेत्यांशी व प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला होता. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार करण्यासाठी बाबांनी इ.स. १९८५ मध्ये ‘भारत जोडो’ अभियान योजले होते. यानिमित्त त्यांनी भारत भ्रमण करून जनतेपर्यंत एकात्मतेचे तत्त्व पोहोचवण्याचा प्रयत्‍न केला. नर्मदा बचाव आंदोलनात तब्बल एक तप (१२ वर्षे) नर्मदाकाठी मुक्काम करून त्यांनी आंदोलनाला पाठबळ दिले होते.

Hope this helps u dude

Similar questions