शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली.
Answers
Answered by
4
Answer:
काय करायचे आहे यात?
.
..
.
Answered by
6
शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी भांड्यांची गरज पडली.
- भूक ही मानवाची मूलभूत गरज आहे. ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो. अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पूर्वापार भांड्यांची गरज निर्माण झाली. स्वयंपाकघरात गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली.
- जिथे जिथे मानवी समाज आहे, तिथे तिथे भांडी असणारच म्हणूनच, भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.’
- लोखंडी भांडी किंवा तांब्या-पितळेची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती. त्या वेळी स्टेनलेस स्टील भांड्यांचा शोधही लागला नव्हता. पूर्वी परसामध्ये केळी लावलेल्या असायच्या.
- केळीचे पान मऊ व लवचीक असते. भांडी धुण्या-घासण्याचा त्रास व वेळ वाचत असे. म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत होती.
- मातीपासून विविध आकारांची भांडी बनवणे शक्य आहे. शिवाय मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मातीच्या भांड्यांतील पदार्थ टिकतात व ताजे राहतात. म्हणून मातीच्या भांडयांचा जास्तीत वापर करावा.
Similar questions