India Languages, asked by teena393, 9 months ago

shramache mahatva marathi essay​

Answers

Answered by zariathegreat
8

Answer:

आजचे युग हे विज्ञान संगणक युग मानले जाते. या संगणक युगात आपण सर्वजण वावरत आहोत. आज संगणक युगामुळे मानवाचे जीवन अगदी सुलभ झाले आहे. त्यामुळे मानव सगळी कामे यंत्राच्या साहाय्याने करू लागला आहे.

त्यामुळे काम करून घाम गाळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे शारीरिक श्रम करणाऱ्या श्रमिकांना आज यंत्र युगाच्या काळात निकृष्ट मानले जात आहे. असे करणे म्हणजे एक प्रकारे श्रमाचा आणि श्रमिकांचा अपमान आहे.

बौद्धिक कष्टा इतकेच शारीरिक कष्ट करणे सुद्धा महत्वाचे आहे. कष्ट केल्यानेच माणसाची प्रगती होते. तसेच जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी सुद्धा श्रम करणे महत्वाचे आहे.

श्रम म्हणजे काय –

श्रम म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती आपले ध्येय व स्वप्न पूर्ण करण्यासाठी शारीरिक किंवा बौद्धिक कष्ट करते व मेहनत करते त्याला एका अर्थाने काम करणे असे म्हटले जाते. श्रम करण्यामागे ध्येय मिळवण्याचा विचार असतो.

Explanation:

plz mark as BRAINLIEST and follow me as well as rate the answer...

Similar questions