India Languages, asked by AryanAshra0206, 11 months ago

Story of lazy boy in Marathi language if spam I will report you. Don’t know then don’t write anything.

Answers

Answered by unnati2009
1

Answer:

Hope It helped you ☺️

Explanation:

एका गावात एक टुमदार बंगला होता. त्या बंगल्याचा मालक श्रीमंत होता. जमीनजुमला, नोकरचाकर, गाडीघोडे अशा सगळ्याच सुखसोयी त्याच्या पदरी होत्या. त्याला सकाळी लवकर उठून स्वत:ची कामं स्वत:च करण्याची सवय होती. सर्व नोकरांनीसुद्धा सकाळी त्याच्याबरोबरच लवकर उठून घरातील इतर कामं करावीत अशी त्याची अपेक्षा असे. सर्वच नोकर मालकाची आज्ञा पाळून त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागत असत. पण त्यातील एक नोकर रामू मात्र फारच आळशी होता. त्याला लवकर उठण्याचा फार कंटाळा येई. सूर्य डोक्यावर येईपर्यंत तो झोपून राहत असे. दुपारी उशीरा कामं करण्यासाठी जागा होत असे. त्याचा हा स्वभाव मालकाला आवडत नसे.

मालकाने रामूला समजावून पाहिलं. पण रामूच्या स्वभावात काहीच फरक पडत नव्हता. शेवटी मालकाने त्याला धडा शिकवायचं ठरवलं. मालकाने रामू झोपला असताना त्याच्या खोलीत एक कोंबडा ठेवला. हा कोंबडा त्याचा आवडता होता. पहाटे त्याच्या बांगेच्या आवाजाने मालक उठत असे. निदान कोंबड्याच्या आरवण्याने तरी रामू जागा होईल असा विचार मालकाने केला. पण हा अविचार होता हे नंतर त्याच्या लक्षात आलं. पहाटे सवयीप्रमाणे रामूच्या खोलीतील कोंबडा आरवला. नेहमीपेक्षा फार लवकर झोपमोड झाल्यामुळे रामू वैतागला. कोंबड्याचा त्याला राग आला. तिरीमिरीतच तो उठला आणि रागाच्या भरात खोलीतील चाकूने कोंबड्यावर वार केला. कोंबड्याचा आवाज ऐकून मालक धावतच आला. पण तोपर्यंत कोंबडा जागीच मेला होता. मालकाच्या एकूण प्रकार लक्षात आला. रागावलेल्या मालकाने ताबडतोब रामूला नोकरीवरुन काढून टाकलं. त्याबरोबर रामूचे डोळे खाडकन उघडले. कोंबड्याला मारल्याचा त्याला पश्चात्ताप झाला. तो मालकाच्या हातापाया पडू लागला. पण मालकाचा प्रिय कोंबडा मेल्यामुळे रामूचं जरासुद्धा ऐकून घेतलं नाही. रामूचा आततायीपणा नडला. पश्चात्तापाची वेळ निघून गेली होती.

तात्पर्य- कोणतीही कृती करताना संयम बाळगणं हिताचं असतं.

Answered by Anonymous
0

Answer:

Hope It helped you ☺️

Explanation:

एका गावात एक टुमदार बंगला होता. त्या बंगल्याचा मालक श्रीमंत होता. जमीनजुमला, नोकरचाकर, गाडीघोडे अशा सगळ्याच सुखसोयी त्याच्या पदरी होत्या. त्याला सकाळी लवकर उठून स्वत:ची कामं स्वत:च करण्याची सवय होती. सर्व नोकरांनीसुद्धा सकाळी त्याच्याबरोबरच लवकर उठून घरातील इतर कामं करावीत अशी त्याची अपेक्षा असे. सर्वच नोकर मालकाची आज्ञा पाळून त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागत असत. पण त्यातील एक नोकर रामू मात्र फारच आळशी होता. त्याला लवकर उठण्याचा फार कंटाळा येई. सूर्य डोक्यावर येईपर्यंत तो झोपून राहत असे. दुपारी उशीरा कामं करण्यासाठी जागा होत असे. त्याचा हा स्वभाव मालकाला आवडत नसे.

मालकाने रामूला समजावून पाहिलं. पण रामूच्या स्वभावात काहीच फरक पडत नव्हता. शेवटी मालकाने त्याला धडा शिकवायचं ठरवलं. मालकाने रामू झोपला असताना त्याच्या खोलीत एक कोंबडा ठेवला. हा कोंबडा त्याचा आवडता होता. पहाटे त्याच्या बांगेच्या आवाजाने मालक उठत असे. निदान कोंबड्याच्या आरवण्याने तरी रामू जागा होईल असा विचार मालकाने केला. पण हा अविचार होता हे नंतर त्याच्या लक्षात आलं. पहाटे सवयीप्रमाणे रामूच्या खोलीतील कोंबडा आरवला. नेहमीपेक्षा फार लवकर झोपमोड झाल्यामुळे रामू वैतागला. कोंबड्याचा त्याला राग आला. तिरीमिरीतच तो उठला आणि रागाच्या भरात खोलीतील चाकूने कोंबड्यावर वार केला. कोंबड्याचा आवाज ऐकून मालक धावतच आला. पण तोपर्यंत कोंबडा जागीच मेला होता. मालकाच्या एकूण प्रकार लक्षात आला. रागावलेल्या मालकाने ताबडतोब रामूला नोकरीवरुन काढून टाकलं. त्याबरोबर रामूचे डोळे खाडकन उघडले. कोंबड्याला मारल्याचा त्याला पश्चात्ताप झाला. तो मालकाच्या हातापाया पडू लागला. पण मालकाचा प्रिय कोंबडा मेल्यामुळे रामूचं जरासुद्धा ऐकून घेतलं नाही. रामूचा आततायीपणा नडला. पश्चात्तापाची वेळ निघून गेली होती.

तात्पर्य- कोणतीही कृती करताना संयम बाळगणं हिताचं असतं.

Hey sorry for late reply  but plzz mark brainlist....

Similar questions