तिफन कविता चा रसग्रहण
Answers
Answered by
3
शास्त्रीय संगीतात राग फुलवणे म्हणून काही एक प्रकार असतो. कवितेतसुद्धा मला त्याचा अनुभव आला आहे. वारंवार त्याच अर्थाचे शब्द, वारंवार थोड्याश्या वेगळ्या अर्थछटेचे शब्द, वारंवार बर्यापैकी वेगळ्या अर्थाचे शब्द, वारंवार भिन्नच अर्थाचे शब्द, वारंवार पूर्णपणे विरुद्धार्थी शब्द..... कविता मनात फुलत जाण्याचा मला अनुभव येतो. राग घिसाडघाईने फुलवला तर मजा येत नाही. कवितासुद्धा आळवावी लागते. आळवण्याचा अनुभव आल्यामुळे वरील कविता आवडल्या. असो.
विंदांच्या आवडलेल्या कवितांचे रसग्रहण म्हणजे संख्येने जय्यत मोठे काम स्मित पण काही काळापूर्वी त्यांच्या 'उंट' या कवितेबद्दल काही मित्रमैत्रिणींशी चर्चा करताना जे वाटले होते ते परत इथे लिहितो. 'उंट' ही कविता बहुतेक 'गाजली' नव्हती. पण महाकवीत्व कुठेच लपून राहत नाही. 'माझ्या मना बन दगड', 'मुक्तीमधले मोल हरवले', इत्यादीसारख्या मराठीला ललामभूत लेणी कोरणार्या असामान्य प्रतिभेची झलक इथेसुद्धा दिसतेच.
क्षितिज नाचले वाळूभवती
वाळु बरळली, 'नाही, नाही.'
अशाच वेळी उंट उगवला;
आणि म्हणाला 'करीन काही.'
अन मानेच्या बुरुजावरती
चढले डोळे अवघड जागी;
क्षितिज पळाले दूर दूर अन
वाळु जाहली हळूच 'जागी'.
रुप पाहूनी असे अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण.
उंट चालला वाळूवरुनी
वाळु म्हणाली 'आहे, आहे.'
...खय्यामाने भरले पेले;
महम्मदाने रचले दोहे.
हा यात्रेकरु तिथे न खळला.
निळा पिरॅमिड शोधीत जाई!
तहानेसाठी प्याला मृगजळ;
भूक लागता तहान खाई.
निळा पिरॅमिड दिसला का पण?
.. खूण तयाची एकच साधी..
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी.
मानवीसंस्कृतीचा जन्म मेसोपोटेमिया नावाने ओळखल्या जाणार्या भूभागात झाला असे मानले जाते. त्याला सर्वात जुन्या लिखित इतिहासाचा आधार आहे. मेसोपोटेमिया म्हणजे तायग्रिस-युफ्रेटीस नद्यांच्या खोर्यांमध्ये येणारा सध्याच्या इराक, इराण, सिरिया इ. मधला भाग होय. मानवाचा जन्म जरी आफ्रिकेत झाला तरी 'समाज' म्हणून जगणे जेव्हा सुरू झाले (यात शेती सुरू झाली, भटकेपणा थांबला, गावे-नगरे वसली, लिपीचा जन्म होऊन लेखन सुरू झाले इ. बाबी येतात) त्याला आपण 'मानवीसंस्कृतीचा जन्म' म्हणतो. हे जगात मुख्यत्वे ५ ठिकाणी झाले - मेसोपोटेमिया, इजिप्त, सिंधू नदीचे खोरे, चीनमधील पीतनदीचे खोरे, मेसोअमेरिका आणि अँडीज पर्वतरांगा. त्यातही उपलब्ध पुराव्यांनुसार मेसोपोटेमियामध्ये हे सर्वात पहिल्यांदा झाले म्हणून त्या भागास 'क्रेडल ऑफ सिव्हिलायझेशन' म्हणतात. मेसोपोटेमियामध्येसुद्धा एका विशिष्ट भागात मानवी समाज उदयास आला. तोच भाग का याचे कारण अगदी स्पष्ट आहे - तो भाग अतिशय सुपीक होता. तो भाग जर नकाशात पाहिला तर चंद्रकोरीसारखा दिसतो म्हणून मेसोपोटेमियामधील त्या विशिष्ट भूभागास आता आपण 'फर्टाइल क्रिसेंट (fertile crescent)' असे नाव दिले आहे.
माझ्या मते, विंदांची उंट ही कविता या मानवीसंस्कृतीच्या उदयासंदर्भात आहे. कवितेच्या सुरूवातीलाच धरलेली वाळवंटी भागाची कास विंदा पूर्ण कवितेत शेवटपर्यंत सोडत नाहीत. सर्व प्रतिमा मनात केवळ वाळवंटच उभे करतात. पण नक्की कुठले वाळवंट? तर -
रुप पाहूनी असे अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
विंदांच्या आवडलेल्या कवितांचे रसग्रहण म्हणजे संख्येने जय्यत मोठे काम स्मित पण काही काळापूर्वी त्यांच्या 'उंट' या कवितेबद्दल काही मित्रमैत्रिणींशी चर्चा करताना जे वाटले होते ते परत इथे लिहितो. 'उंट' ही कविता बहुतेक 'गाजली' नव्हती. पण महाकवीत्व कुठेच लपून राहत नाही. 'माझ्या मना बन दगड', 'मुक्तीमधले मोल हरवले', इत्यादीसारख्या मराठीला ललामभूत लेणी कोरणार्या असामान्य प्रतिभेची झलक इथेसुद्धा दिसतेच.
क्षितिज नाचले वाळूभवती
वाळु बरळली, 'नाही, नाही.'
अशाच वेळी उंट उगवला;
आणि म्हणाला 'करीन काही.'
अन मानेच्या बुरुजावरती
चढले डोळे अवघड जागी;
क्षितिज पळाले दूर दूर अन
वाळु जाहली हळूच 'जागी'.
रुप पाहूनी असे अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण.
उंट चालला वाळूवरुनी
वाळु म्हणाली 'आहे, आहे.'
...खय्यामाने भरले पेले;
महम्मदाने रचले दोहे.
हा यात्रेकरु तिथे न खळला.
निळा पिरॅमिड शोधीत जाई!
तहानेसाठी प्याला मृगजळ;
भूक लागता तहान खाई.
निळा पिरॅमिड दिसला का पण?
.. खूण तयाची एकच साधी..
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी.
मानवीसंस्कृतीचा जन्म मेसोपोटेमिया नावाने ओळखल्या जाणार्या भूभागात झाला असे मानले जाते. त्याला सर्वात जुन्या लिखित इतिहासाचा आधार आहे. मेसोपोटेमिया म्हणजे तायग्रिस-युफ्रेटीस नद्यांच्या खोर्यांमध्ये येणारा सध्याच्या इराक, इराण, सिरिया इ. मधला भाग होय. मानवाचा जन्म जरी आफ्रिकेत झाला तरी 'समाज' म्हणून जगणे जेव्हा सुरू झाले (यात शेती सुरू झाली, भटकेपणा थांबला, गावे-नगरे वसली, लिपीचा जन्म होऊन लेखन सुरू झाले इ. बाबी येतात) त्याला आपण 'मानवीसंस्कृतीचा जन्म' म्हणतो. हे जगात मुख्यत्वे ५ ठिकाणी झाले - मेसोपोटेमिया, इजिप्त, सिंधू नदीचे खोरे, चीनमधील पीतनदीचे खोरे, मेसोअमेरिका आणि अँडीज पर्वतरांगा. त्यातही उपलब्ध पुराव्यांनुसार मेसोपोटेमियामध्ये हे सर्वात पहिल्यांदा झाले म्हणून त्या भागास 'क्रेडल ऑफ सिव्हिलायझेशन' म्हणतात. मेसोपोटेमियामध्येसुद्धा एका विशिष्ट भागात मानवी समाज उदयास आला. तोच भाग का याचे कारण अगदी स्पष्ट आहे - तो भाग अतिशय सुपीक होता. तो भाग जर नकाशात पाहिला तर चंद्रकोरीसारखा दिसतो म्हणून मेसोपोटेमियामधील त्या विशिष्ट भूभागास आता आपण 'फर्टाइल क्रिसेंट (fertile crescent)' असे नाव दिले आहे.
माझ्या मते, विंदांची उंट ही कविता या मानवीसंस्कृतीच्या उदयासंदर्भात आहे. कवितेच्या सुरूवातीलाच धरलेली वाळवंटी भागाची कास विंदा पूर्ण कवितेत शेवटपर्यंत सोडत नाहीत. सर्व प्रतिमा मनात केवळ वाळवंटच उभे करतात. पण नक्की कुठले वाळवंट? तर -
रुप पाहूनी असे अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
Similar questions