Art, asked by kunaldeo4361, 1 year ago

तुलना करा/साम्य लिहा.
आगळ-वाड्याचे कवच, आजी- कुटुंबाचे संरक्षक कवच​

Answers

Answered by HarleenKaur88
4

Answer:

वाड्याच्या दाराला लावलेली आगळ हे वाड्याचे संरक्षक कवच म्हणून काम करते.

ही आगळ लावल्यावर वाड्यातील लोकांना सुरक्षित वाटायचे

त्यांना चोरांपासून व दारोडेखोऱ्यांपासून संरक्षण मिळायचे. त्यामुळे, ते निवांत झोपू शकत होते.

त्याचप्रकारे, आजी ही कुटुंबाचे रक्षण दुष्ट लोकांपासून व वाईट विचारांपासून करत होती. तिच्यामुळे घरात भांडणं होत नव्हती व सुख नांदत होते.

ती घरातल्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असायची. तिच्या शिस्तीमुळे व मायेमुळे घरातल्यांना सुरक्षित वाटायचे.

अशा प्रकारे, जसे आगळ वाड्याचे कवच होते, तसेच आजी ही कुटुंबाची संरक्षण कवच होती.

Similar questions