Geography, asked by gp2442424, 4 months ago

त्रिकोणी आकारात होणाऱ्या गाळाच्या संचयन आतून यांची निर्मिती होते.​

Answers

Answered by sujal1247
1

Answer:

त्रिकोणी आकारात होणाऱ्या गाळाच्या संचयन आतून यांची निर्मिती होते.

बाह्यप्रक्रियाभाग-

बाह्यप्रक्रिया: खनन (अपक्षरण) कार्यामुळे भूपृष्ठाची मुख्यत: झीज होते, हे आपण मागील पाठात शिकलो. अपक्षरणकार्यातून तयार झालेला गाळ कारकांकडून वाहून नेला जातो . कारकांची गती कमी झाल्यावर त्याचे संचयन होते. या पद्धतीने वाहते पाणी (नदी), हिमनदी, वारा, सागरी लाटा व भूजल ही कारके अपक्षरण, वहन व संचयनाचे कार्य करतात. या कारकांमुळे भूपृष्ठात सतत बदल घडून येतात व नवनवीन भूरूपे तयार होतात. यातील काही भूरूपांची माहिती आपण या पाठात घेऊया.

नैसर्गिकरीत्या एकत्रित झालेला पाण्याचा ओघ गुरुत्वाकर्षणशक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठावर उताराच्या दिशेने वाहू लागतो व स्वत :चा मार्ग आखत जातो . याला जलप्रवाह म्हणतात. असे अनेक जलप्रवाह एकत्र येऊन नदीची निर्मिती होते.भूप्रदेशाचा उतार, खडकाचा प्रकार, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग, प्रवाहाची लांबी, नदीतील गाळाचे प्रमाण इत्यादी घटकांवर नदीचे खनन, वहन व संचयनकार्य अवलंबून असते.

नदीचेखननकार्य:

नदीचा उगम समुद्रसपाटीपासून खूप उंचावर होतो . येथे नदी खूप वेगाने वाहते, त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती जास्त असते. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती,दगडगोटे यांमुळे तसेच तिला येऊन मि ळणाऱ्या अनेक उपप्रवाहांमुळे नदीच्या तळाचे व काठांचे खनन होते. यामुळे घळई, ‘व्ही ’(

नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात वाहत येते. पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळे नदीतील भरड गाळाचे संचयन या ठिकाणी होते. त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनातून पंखाकृती मैदाने तयार होतात. मंद उतारामुळे नदीचा वेग कमी होतो व नदीची वहनक्षमता कमी झाल्यामुळे ती संथपणे वाहू लागते. लहानशा अडथळ्यां नादेखील वळणे (नागमोडी) घेत नदीचा प्रवाह पुढे जात असतो . नदी समुद्राजवळ पोहोचेपर्यंत तिचे पात्र खूप रुंद होते व तिचा वेग खूपच कमी होतो . नदीतला गाळ तिच्या पात्रात व काठावरील प्रदेशात साठतो . नदीतील गाळाचे संचयन होण्यासाठी नदीची लांबी, पाण्याचे प्रमाण, नदीतील गाळाचे प्रमाण आणि भूपृष्ठाचा व नदीचा उतार इत्यादी घटक आवश्यक असतात. अशाप्रकारे गाळाचे संचयन झाल्यामुळे नदीपात्राच्या आजूबाजूस पूरतट, पूरमैदाने, तर मुखाकडील भागात त्रिभुज प्रदेश इत्यादी भूरूपे तयार होतात. आकृती ४.१ पहा.शिक्षकांच्या मदतीने घळई, ‘व्ही ’आकाराची दरी, धबधबा, पंखाकृती मैदान, नदीचे नागमोडी वळण, पूरतट, पूरमैदाने व त्रि भुज प्रदेश ही भूरूपे कशी तयार होत असावीत,ते समजून घ्या

नदीच्या कार्यामुळे तयार झालेल्या काही भूरूपांची छायाचित्रे दिली आहेत, ती पहा. ती भूरूपे नदीच्या कोणत्या कार्यामुळे तयार झाली असावीत, ते छायाचित्रां खालील चौकटींत लि हा.

जरा विचार करा.

कोकणच्या किनारपट्टीवर अनेक खाड्या आहेत, पण त्रिभुज प्रदेश नाही, असे का?

नदीच्या नागमोडी वळणाजवळ एखादे सरोवर असते का? त्याची माहिती मिळवा.

Similar questions