Social Sciences, asked by gawaiarchana837, 1 month ago

तत्त्वज्ञानाला सर्व विषयांची जननी का मानण्यात येते

Answers

Answered by mudavathanjali825
10

Answer:

भारतीय आणि पाश्चात्य अर्थाने पाहता, मानव स्वतःच्या अनुभवांची, व्यवहारांची जाणीव असलेला असा प्राणी असल्याने त्याच्या या आत्मजाणीव असणाऱ्या प्रकृतीचा होणारा बौद्धिक आविष्कार म्हणजे तत्त्वज्ञान, असे म्हणता येते.

Answered by Anonymous
9

Answer:

शैक्षणिक तत्त्वज्ञान : शैक्षणिक तत्त्वज्ञान या संकल्पनेची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि आवश्यकता समजण्यासाठी ⇨ शिक्षण आणि ⇨ तत्त्वज्ञान म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक असते.

Explanation:

शिकणे ही एक मानसशास्त्रीय क्रिया आहे, तर शिक्षण या संकल्पनेची व्याप्ती मोठी आहे. शिक्षण हे शाळेबरोबर संपत नाही, तर ते जन्मभर चालू असते. तसेच शिक्षण हे शाळेबाहेरही चालू असते. यातूनच औपचारिक व अनौपचारिक शिक्षण या संकल्पना पुढे आल्या.

मानवाला ज्ञात असलेली बरीच शास्त्रे वर्णनात्मक असतात मात्र तत्त्वज्ञान हे मूल्यमापनात्मक शास्त्र आहे. ते कोणत्याही गोष्टीचे मूल्य, हेतू आणि उपयोग काय आहे, हे पाहणारे शास्त्र आहे, एखादया लहान घटनेपासून ते थेट विश्वयोजनेपर्यंत सर्व गोष्टींचा व अनुभवांचा गूढार्थ शोधून काढणे व शास्त्रशुद्घ संगती लावणे, हा तत्त्वज्ञानाचा विषय आहे. तत्त्वज्ञान काहीसे अव्यक्त असते व या शास्त्रात तर्कशास्त्राच्या साहाय्याने विचार करावयाचा असतो. तत्त्वज्ञानात मोठमोठया गहन प्रश्नांचा विचार केला जातो. थोडक्यात मानवाच्या प्रकृतीचा होणारा बौद्धिक आविष्कार म्हणजे तत्त्वज्ञान होय. विश्वाच्या व जीवनाच्या वैविध्यपूर्ण तपशीलाचे सर्वसमावेशक असे संकलन करण्याचा प्रयत्न म्हणजे तत्त्वज्ञान होय. मानवाला येणाऱ्या विविध अनुभवांची संगती लावणे, त्यात एकसूत्रीपणा आणणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य होय.

एका अर्थाने तत्त्वज्ञान व शिक्षण यांची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती ही एकच आहेत असे म्हणता येईल. शिक्षणाने मनुष्य ज्ञानसंपन्न व सद्‌गुणी व्हावा, त्याला उत्कृष्ट जीवनाचा लाभ व्हावा आणि कृतार्थतेचे समाधान लाभावे, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. का शिकवावे, कसे शिकवावे या प्रश्नांची उत्तरे या अपेक्षांनी दिली जातात. पण त्यातील उत्कृष्ट जीवन म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञान व नीतिशास्त्र यांकडे वळावे लागते. आदर्श, सुखी वा सफल, परिपूर्ण जीवन या विषयींच्या कल्पना तत्त्वज्ञानातून मिळतात. त्या साकार करण्याचा प्रयत्न शिक्षण करीत असते. याचा अर्थ असा की शिक्षण ही तत्त्वज्ञानाची क्रियात्मक, गतिमान, आचारात्मक बाजू आहे. तत्त्वज्ञान व त्याचा आचार यांत जर फारकत करावयाची नसेल, तर तत्त्वज्ञानाला शिक्षणाची जोड हवी. जिज्ञासा आणि चौकशी हीच दोहोंची पद्धती आहे. गतिमान तत्त्वज्ञान म्हणजे शिक्षण होय. तत्त्वज्ञानाप्रमाणे शिक्षणशास्त्रही जीवनाचा शोध घ्यावयाला व त्याचे स्वरूप समजून घ्यावयाला शिकवीत असते. जिज्ञासा आणि अन्वेषण हीच दोहोंची पद्घत असते.

वरील अध्यात्मवाद, निसर्गवाद, कार्यवाद आणि वास्तववाद यांच्या विवरणात शैक्षणिक समस्यांकडे बघण्याच्या तात्त्विक दृष्टिकोनात आढळणाऱ्या मतभिन्नतेचाच बहुतांशी निर्देश करण्यात आला आहे. मात्र त्या तत्त्वमीमांसेत बरेच खरेखुरे मतैक्याचेही मुद्दे आहेत, या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले आहे. आतापर्यंतच्या तत्त्वमीमांसेचे उद्दिष्ट असे होते की, शैक्षणिक तत्त्ववेत्त्यांत अधिक मतैक्याचे मुद्दे का सापडू शकत नाहीत हे समजावून घ्यावे. सामान्यतः असे आढळते की शाळांमधील किमान आवश्यक सुविधा, अभ्यासक्रम, अध्यापनाच्या पद्धती, मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त असण्याची आवश्यकता यांसारख्या बाबींमध्ये स्थूलमानाने तत्त्ववेत्त्यांमध्ये मतैक्यच आहे. दुसरे असे की कोणत्याही देशात एकच एक तत्त्वमीमांसेवर आधारित शिक्षणपद्धती आढळत नाही. चारही प्रमुख विचारप्रवाहांतील त्या देशास उपयुक्त अशी तत्त्वे एकत्र करून प्रत्येक देशाचे स्वतःचे शिक्षणाचे तत्त्वज्ञान तयार होते. लोकशाहीचे दृष्टीने ते योग्य होय.

Similar questions